शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

खुनातील १८९ कैदी सांगली कारागृहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:47 IST

खटले न्यायप्रविष्ट : गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सचिन लाड --सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ‘खून का बदला खून’ या रागातून अनेकांचे मुडदे पाडण्यात आले. अनैतिक संबंध, जमिनीचा वाद, पूर्ववैमनस्य, प्रेमप्रकरण व किरकोळ कारणातून हे खून झाले. या खुनांतील तब्बल १८९ कैदी सांगली कारागृहात न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १८४ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना पोलिस व कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. सांगलीचे कारागृह २३५ कैद्यांच्या क्षमतेचे आहे. यामध्ये २०५ पुरुष व ३० महिलांना ठेवता येते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढच होत राहिल्याने कारागृहात कैद्यांची संख्या वाढत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांतील कैदी येथे आहेत. विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांतील कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कैद्यांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना डोळ्यात तेल घालून त्यांना काम करावे लागत आहे. रविवारअखेर तब्बल ३९० कैदी होते. गेल्या चार-पाच वर्षात पहिल्यांदाच कैद्यांची संख्या एवढी झाली आहे. दोन-चार कैदी जामिनावर बाहेर पडत असले तरी, तेवढेच नव्याने आत येतात. त्यामुळे कैद्यांच्या या संख्येत नेहमीच चढ-उतार होत राहिला आहे.खुनातील १८९ कैदी आहेत. काहींनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळाला नाही. पंधरवड्यातून एकदा त्यांना न्यायालयात उभे केले जाते. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. काहींनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळाला नाही. पंधरवड्यातून एकदा त्यांना न्यायालयात उभे केले जाते. खटले न्यायप्रविष्ट असले तरी, निकाल कधी लागतो, याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. संजयनगरमधील मनोज कदम याचा खून केल्याप्रकरणी गुंड म्हमद्या नदाफसह २४ जणांना अटक करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व संशयितांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवले आहे. ते येथे असते तर खुनांतील कैद्यांची संख्या दोनशेवर गेली असती. तसेच जिल्हा परिषदेच्या पेपर फुटीतील २४ संशयितांना जामीन मिळाला आहे. तेही सर्वजण येथे असते, तर कैद्यांची संख्या साडेचारशेपर्यंत गेली असती. मे महिन्यात १६ खूनजिल्ह्यात मे महिन्यात तब्बल १६ खून झाले. या खुनातून ५० ते ५५ नवीन संशयित रेकॉर्डवर आले. तेही सध्या कारागृहात आहेत. खुनातील कैद्यांची संख्या वाढण्यास हे कारणही आहे. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहिले, तर कैद्यांना ठेवण्यासाठी सांगलीचे कारागृह अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर हलविण्याचा निर्णय योग्य आहे. तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर तो शासनाकडे गेला आहे.