शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गुंठेवारीतील १५ हजार घरांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:25 IST

सांगली : राज्य शासनाने डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील १५ ...

सांगली : राज्य शासनाने डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील १५ हजार मालमत्ताधारकांना लाभ होणार आहे. पूर्वीच्या गुंठेवारी कायद्यातील पळवाटा शोधून भानगडी करणाऱ्यांनाही या निर्णयाने चाप बसणार आहे. तसेच महापालिकेसह शासनाच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये १९८५ मध्ये शेतजमिनीची तुकडे पद्धतीने म्हणजेच गुंठेवारी पद्धतीने प्लॉट पाडून विक्री करण्यात आली. शहरालगतच्या शेतीक्षेत्रात ७० टक्के वसाहती निर्माण झाल्या. २००१ मध्ये शासनाने गुंठेवारीचा कायदा केला. सुरुवातीला नियमितीकरणाला प्रतिसाद मिळाला. नंतर नागरिकांनी याकडे पाठ फिरविली आहे.

महापालिकेने २००४-०५ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार गुंठेवारी क्षेत्रात ४५ ते ४८ हजार घरे होती. त्यापैकी ३० ते ३५ हजार घरांचे नियमितीकरण झाले आहे. गुंठेवारी नियमितीकरणासाठी २००१ पूर्वीची कब्जेपट्टी, कराराची अट होती. आता शासनाच्या नव्या निर्णयामुळे डिसेंबर २०२० पर्यंत गुंठेवारी योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे २०२० पर्यंत गुंठेवारीत झालेली घरे नियमित होणार आहेत. महापालिका क्षेत्रात २००१ पूर्वीची व नंतरची जवळपास १५ हजार घरे गुंठेवारीत आहेत. या घरांना नव्या निर्णयाचा लाभ होईल. गुंठेवारी कायद्यात पळवाटा शोधून भानगडी होत होत्या. जुने मुद्रांक शोधून त्यावर कब्जेपट्टी घेतली जात होती. या जुन्या मुद्रांकांना हजारो रुपये मोजले जात होते. या साऱ्या भानगडींना आता चाप बसणार आहे.

चौकट

कोट

शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे २००१ नंतर गुंठेवारीत घरे बांधलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे घरही आता अधिकृत होणार आहे. बऱ्याच वर्षांपासून गुंठेवारी संघर्ष समितीकडून योजनेला मुदतवाढ देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश आले.

- चंदन चव्हाण, अध्यक्ष, गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती.

चौकट

कोट

गुंठेवारी नियमितीकरणाची मुदत शासनाने वाढविल्याचा नागरिकांना फायदा होईल. प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील सिटी सर्व्हेनिहाय सर्वेक्षण केले पाहिजे. यात घरे अधिकृत आहेत की नाही, याची माहिती समोर येईल. जी घरे अनधिकृत आहेत, त्यांच्याकडून शुल्क भरून ती नियमित करता येतील. त्यातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

- हणमंत पवार, माजी नगरसेवक

चौकट

३५ हजार प्रस्ताव दाखल

गुंठेवारी नियमितीकरणासाठी सांगलीतून १९ हजार, तर मिरज व कुपवाडमधून १६ हजार असे एकूण ३५ हजार प्रस्ताव दाखल झाले होते. या प्रस्तावांतून महापालिकेला ३० कोटीचे उत्पन्न मिळाले. यापैकी सांगलीतील १३ हजार, मिरज व कुपवाडमधील १० हजार प्रस्ताव नियमित करण्यात आले आहेत. ३६७ प्रस्तावांत त्रुटी होत्या. ब्ल्यू झोन, बफर झोन, रस्त्याने बाधित असलेले ३ हजार २३१ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सांगलीतील तीन हजार, तर मिरज व कुपवाडमधील ५ हजार असे एकूण ८ हजार प्रस्ताव प्रलंबित होते. त्यात २००१ नंतर गुंठेवारी झालेल्या घरांचा समावेश केल्यास १५ हजार नागरिकांना शासन निर्णयाचा लाभ होईल.