शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सामाजिक न्याय विभागाचे १०५ कोटी गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

सांगली : समाजकल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिव स्तरावरील उदासिनतेमुळे राज्यातील ३० जिल्ह्यांचा १०५ कोटींचा अखर्चित ...

सांगली : समाजकल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिव स्तरावरील उदासिनतेमुळे राज्यातील ३० जिल्ह्यांचा १०५ कोटींचा अखर्चित निधी परत गेला असल्याची माहिती समोर आली आहे. रिपब्लिकन स्टुडंट युनियनने याप्रकरणी समाजकल्याणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रिपब्लिकन स्टुडंट युनियनने ही माहिती मिळविली. हा निधी शासनाकडे ३१ मार्च २०२१ रोजी समर्पित झालेला आहे. कोरोनाच्या काळात आधीच निधीची कमतरता असताना, तसेच राज्यातील लाखो मागासवर्गीय, बौद्ध, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फ्रीशिप थकीत असताना, मिळालेला १०५ कोटींचा निधी अखर्चित ठेवण्यात आला. यापूर्वीही केंद्र शासनाने महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देऊ केलेले २ हजार १५४ कोटी केवळ महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे इतर राज्यांकडे वळविण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षात मंजूर केलेले ८४ कोटी खर्च करण्यासाठीचे प्रस्ताव समाज कल्याण आयुक्तांकडे पाठविले होते, परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निधी समर्पित झाला आहे. औद्योगिक सहकारी सूतगिरण्यांना मंजूर केलेला १९ कोटी १६ लाखांचा निधीही अखर्चित राहिल्याने समर्पित झाला आहे.

चौकट

जिल्हानिहाय परत गेलेला निधी

सांगली जिल्ह्यातून ५० लाख, कोल्हापूर ८ कोटी, अहमदनगर ३ कोटी, जळगाव ५ कोटी, मुंबई उपनगर ५ कोटी, ठाणे ७ कोटी ५० लाख, रायगड ४ कोटी ८७ लाख, रत्नागिरी १ कोटी ३० लाख, पुणे २५ लाख, धुळे २ कोटी, नंदुरबार ५० लाख, जालना ३ कोटी, बीड १९ कोटी, परभणी ३ कोटी, लातूर ३ कोटी, उस्मानाबाद २५ लाख, नांदेड १ कोटी ५० लाख, हिंगोली ५० लाख, अमरावती ३ कोटी, यवतमाळ ३ कोटी, अकोला ४५ लाख, वाशीम २ कोटी ५० लाख, नागपूर १ कोटी, बुलढाणा ३ कोटी, गडचिरोली १ कोटी, चंद्रपूर २ कोटी, भंडारा १ कोटी, वर्धा २० लाख, गोंदिया ७ कोटी ३१ लाख अशा ३० जिल्ह्यांमधून १०५ कोटींचा निधी शासनास परत गेला आहे.

कोट

समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे हे अकार्यक्षम आहेत. त्यांना या पदावरून काढून टाकून समाज कल्याण आयुक्तालय व सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना याप्रकरणी तत्काळ निलंबित करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.

- अमोल वेटम, महासचिव, रिपब्लिकन स्टुडंट युनियन