शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

टेंभू, ताकारी, म्हैसाळला हवेत १००० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या ...

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या कालावधीत झाली. ताकारी-म्हैसाळ योजनांची कामे सुरू होऊन ३७ वर्षे, तर टेंभूला २६ वर्षे झाली आहेत. तरीही तिन्ही योजनांची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. आजही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी जात नाही. मुख्य कालव्याची कामे पूर्ण झाल्यामुळे दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे, असा पाटबंधारे विभागाचा दावा आहे. ओढे, नाल्यांद्वारेच तलाव भरून दिले जात आहेत. पोट कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. सध्या बंदिस्त जलवाहिनीद्वारे थेट पाझर तलाव, शेत तलावामध्ये पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे.

टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी ४०० कोटी, तर ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ६०० कोटी अशा एक हजार कोटींच्या निधीची गरज आहे. यापैकी सध्या तातडीने टेंभूसाठी ३०० कोटी आणि ताकारी-म्हैसाळ योजनांसाठी ३५० कोटीची गरज आहे. या निधीची पाटबंधारे विभागाने राज्य शासनाकडे मागणी केली आहे.

कोट

म्हैसाळ योजनेची कामे शासनाने तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. नियमित पाणी मिळेल याची खात्री झाल्याशिवाय बागायती पीक घेता येत नाही. पोट कालव्यांची कामेही पूर्ण झाली पाहिजेत.

-महादेव पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याचेही काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. कालव्याचे अस्तरीकरण केलेले नाही. पोट कालव्यांची कामे तर कोठेच झालेली नाहीत. अपूर्ण कामे पूर्ण करून शासनाने दुष्काळी भागाला दिलासा द्यावा.

-सतीश मंडले, शेतकरी.

कोट

जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. शासनाने पाणी सोडण्याची आणि पाणीपट्टी वसुलीची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या पैशाचा हिशेबही शेतकऱ्यांना द्यावा.

-सुरेश पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या अपूर्ण कामांसाठी शासनाकडे साडेसहाशे कोटींची मागणी केली आहे. सध्या टेंभूचे १० टक्के तर ताकारी-म्हैसाळ योजनेचे १५ टक्के काम अपूर्ण आहे. येत्या वर्षभरात सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील.

-मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.