शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू, ताकारी, म्हैसाळला हवेत १००० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या ...

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या कालावधीत झाली. ताकारी-म्हैसाळ योजनांची कामे सुरू होऊन ३७ वर्षे, तर टेंभूला २६ वर्षे झाली आहेत. तरीही तिन्ही योजनांची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. आजही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी जात नाही. मुख्य कालव्याची कामे पूर्ण झाल्यामुळे दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे, असा पाटबंधारे विभागाचा दावा आहे. ओढे, नाल्यांद्वारेच तलाव भरून दिले जात आहेत. पोट कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. सध्या बंदिस्त जलवाहिनीद्वारे थेट पाझर तलाव, शेत तलावामध्ये पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे.

टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी ४०० कोटी, तर ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ६०० कोटी अशा एक हजार कोटींच्या निधीची गरज आहे. यापैकी सध्या तातडीने टेंभूसाठी ३०० कोटी आणि ताकारी-म्हैसाळ योजनांसाठी ३५० कोटीची गरज आहे. या निधीची पाटबंधारे विभागाने राज्य शासनाकडे मागणी केली आहे.

कोट

म्हैसाळ योजनेची कामे शासनाने तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. नियमित पाणी मिळेल याची खात्री झाल्याशिवाय बागायती पीक घेता येत नाही. पोट कालव्यांची कामेही पूर्ण झाली पाहिजेत.

-महादेव पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याचेही काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. कालव्याचे अस्तरीकरण केलेले नाही. पोट कालव्यांची कामे तर कोठेच झालेली नाहीत. अपूर्ण कामे पूर्ण करून शासनाने दुष्काळी भागाला दिलासा द्यावा.

-सतीश मंडले, शेतकरी.

कोट

जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. शासनाने पाणी सोडण्याची आणि पाणीपट्टी वसुलीची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या पैशाचा हिशेबही शेतकऱ्यांना द्यावा.

-सुरेश पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या अपूर्ण कामांसाठी शासनाकडे साडेसहाशे कोटींची मागणी केली आहे. सध्या टेंभूचे १० टक्के तर ताकारी-म्हैसाळ योजनेचे १५ टक्के काम अपूर्ण आहे. येत्या वर्षभरात सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील.

-मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.