शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
4
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
5
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
6
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
7
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
8
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
9
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
10
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
11
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
12
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
13
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
14
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
15
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
16
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
17
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
18
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
19
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
20
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली

स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 18:34 IST

मुलांना वळण लावणं अगदीच सोपं, पण तितकंच अवघडही..

ठळक मुद्देपालकांनी अगोदर स्वत:ला शिस्त लावण्याची गरज.अनुकरणातून आणि प्रेमानंच मुलांना शिस्त लागू शकते.योग्य तीच गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे.

- मयूर पठाडेकसं लावायचं मुलांना वळण? कशी लावायची त्यांना शिस्त?.. घराघरातला हा प्रश्न आणि घराघरातले पालक त्यामुळे वैतागलेले. सुजाण पालकत्त्वाचे धडे तसे साºयांनीच गिरवलेले. तरीही त्यांना प्रश्न पडतो.. अरे, एवढी काळजी आम्ही घेतोय, तरी आपलं मूल असं का? का नाही लागत त्याला वळत..कधीतरी मग पालकांचाही संयम सुटतो आणि मग ते ‘वळणावर’ येतात. सुरुवात होते ते ती रागावण्यापासून आणि मग हळूहळू मुलांची पाठ शेकायला सुरुवात होते.त्यातली पुन्हा गंमतीची गोष्ट अशी, कोणत्याही पालकाला आपल्या मुलाला मारायला, रागवायला आवडत नाही, पण त्यापासून त्यांना राहावतही नाही. हा संयम तुटतोच आणि मुलांनी ऐकलं नाही, बेशिस्त वर्तन केलं की त्यांना मार बसायला लागतो..मुलांना मारल्यानंतर पालकांनाही खूप खूप वाईट वाटतं. काही पालक तर स्वत:लाच शिक्षा करून घेतात, पण तरीही अपेक्षित बदल दिसत नाही, तो नाहीच.मुलांना वळण, शिस्त लावायची तरी कशी?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिस्त सुरू झाली पाहिजे ती स्वत:पासूनच. आपण स्वत:च जर शिस्त पाळली, सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी केल्या तर मुलांनाही आपोआपच ते वळण लागेल.२- आपणच जर पसारा करीत असू, वस्तू, आपले कपडे, जेवणाचं ताट, वर्तमानपत्र, अंथरुण, पांघरुण.. कुठेही फेकत असू, आरडाओरडा करीत असू, तर नकळतपणे मुलांच्या मनावरही तेच बिंबत जातं.३- आपल्या बोलण्याचा टोन बघा. तो कधीही वरच्या सुरातला, तिरकस नको.४- मुलांशी बोलत असताना कोणते शब्द आपण वापरतो, रागाच्या भरात आपण काहीही अद्वातद्वा त्यांना बोलतो का, याकडेही लक्ष द्या.५- कोणत्याही कारणानं मूल जेव्हा तुमच्याशी बोलतं, तुमच्याकडे येतं, त्यावेळी त्याला योग्य तोच सल्ला मिळाला पाहिजे. काहीतरी थातूरमातूर सांगून त्याची बोळवण करायला नको. आपल्याला ती गोष्ट माहीत नसेल, तर नंतर, अभ्यास करून, विचारुन सांगा, पण योग्य तीच गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मुलंही मग आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना शॉर्ट कट मारत नाहीत.६- एक लक्षात घ्या, मारझोड करून, आरडाओरड करून, धाकात ठेवून मुलांना कधीही शिस्त लागत नाही. मुलांना शिस्त लागते ती प्रेमानं आणि अनुकरणातून. ही ‘शिस्त’ आपण स्वत:ला लावली, तर मुलं त्यातून खूप काही शिकतील.