शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

क्लासला दांडी परवडली, पण मुलांच्या नाश्त्याला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 15:05 IST

आपल्या मुलांना जर खरंच आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यांच्या नाश्त्याकडे पुरवा जातीनं लक्ष

ठळक मुद्देनाश्ता न केल्यामुळे मुलांच्या वाढीवर होतो विपरित परिणाम.३१.५ टक्के मुलांना किमान अत्यावश्यक प्रमाणातील लोह मिळू शकत नाही. १९ टक्के मुलांना किमान मात्रेतील कॅल्शियम मिळत नाही.२१.५ टक्के मुलांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात आयोडिन पाहिजे तेवढंही मिळत नाही.

- मयूर पठाडेआजकाल मुलांचं पण ना, किती करावं लागतं.. त्यांची शाळेची तयारी, अभ्यास, ट्यूशन, होमवर्क, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स.. मुलांचं करता करता पालकांचा, विशेषत: आयांचा जीव पार मेटाकुटीला येतो.मुलंही वाघ पाठी लागल्याप्रमाणे धावत असतात. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं.. सगळ्याच गोष्टी करायच्या तर त्यासाठी धावावंच लागतं. पुढे जायचं तर त्याला गत्यंतर नाही, हे आता पालकांप्रमाणेच मुलांनाही माहीत झालं आहे आणि त्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते.मुलांच्या या साºयाच गडबडीत आणि पळापळीत पालकांनाही भाग घ्यावाच लागतो. त्याचबरोबर मुलांसोबतच नातं हेल्दी राहील यासाठीही त्यांना आटापिटा करावा लागतो. पण हा आटापिटा करत असताना मुलं खरोखरच हेल्दी आहेत का, याकडे बºयाचदा पालकांचं दुर्लक्ष होतं. काहीवेळा त्याला नाईलाजही असतो.सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता. दिवसभराच्या पळापळीत नाश्ता ही अशी एक गोष्ट आहे जी मुलांच्या शरीर आणि मनाला ताकद पुरवू शकते, पण हीच गोष्ट अनेक मुलांच्या दिनचर्येतून सध्या हद्दपार होताना दिसते आहे. ‘उशीर होतोय, वेळ होतोय, आवडत नाही’ म्हणून मुलंही बºयाचदा नाश्त्याला दांडी मारुन शाळा, क्लासेसला पळतात.संशोधकांनी याचबाबत पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुलांचा दररोज सकाळचा नाश्ता कधीही चूकवू नका असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला आहे.यासंदर्भात संशोधकांनी नुकताच एक अभ्यासही केला.

काय सांगतो शास्त्रज्ञांचा अभ्यास?१) शास्त्रज्ञांनी अनेक शाळकरी मुलांची पाहणी केली. त्यात त्यांना दिसून आलं नाश्ता न केल्यामुळे अनेक मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.२) नाश्त्याला दांडी मारल्यामुळे तब्बल ३१.५ टक्के मुलांना किमान अत्यावश्यक प्रमाणातील लोह मिळू शकत नाही.३) १९ टक्के मुलांना किमान मात्रेतील कॅल्शियम मिळत नाही.४) २१.५ टक्के मुलांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात आयोडिन पाहिजे तेवढंही मिळत नाही.५) ७.३ टक्के मुलांना किमान प्रमाणातील फोलेटही मिळत नाही.त्याचवेळी जी मुलं दररोज नाश्ता करतात त्यांच्यात मात्र हे सारेच अत्यावश्यक घटक योग्य त्या प्रमाणात शास्त्रज्ञांना आढळून आले.शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करताना सकाळी सहा ते नऊ ही वेळ आणि शंभर कॅलरीचा नाश्ता हे घटक विचारात घेतले होते.अनेक मुलं या चाचणीत फेल झाले. अर्थातच त्यांच्या भावी आणि वर्तमान आयुष्यातही त्यांना त्याचा फटका बसेल असं निरीक्षण नोंदवायलाही शास्त्रज्ञ विसरले नाहीत.त्यामुळे एकवेळ मुलाचा क्लास बुडला तरी चालेल, पण त्याचा नाश्ता मात्र चुकू देऊ नका..