शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सज्ञान असलात, तरच लग्नाच्या भानगडीत पडा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:55 IST

..नाहीतर किडनॅपिंग आणि प्रसंगी बलात्काराच्या आरोपालाही मुलांना सामोरं जावं लागू शकतं

ठळक मुद्देमुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी, पण १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध ठरू शकतं.‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ असं जर मुलीनं ठामपणे सांगितलं तरच मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही.लग्न करताना मुलगा आणि मुलगी दोघांनीही सज्ञान असणंच आवश्यक.

प्रेमानं दोघांवर अक्षरश: गारुड केलेलं असतं. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं, पण घरच्यांपुढे गाडी अडलेली असते.आणि बघता बघता एक दिवस जोडी नौ दो ग्यारह होते...मग दोघांच्या घरचे शोधाशोध सुरू करतात. कॉलेज, नातेवाईक, मित्रमैत्रिणी अशा ठिकाणी शोधाशोध सुरू झाली, की साहजिकच पालक पोलीस स्टेशनला जातात आणि फिर्याद कसली नोंदवतात, तर माझ्या मुलीला कोणीतरी/अमुक मुलानं पळवून नेलं.’आणि मग तपासाची दिशाच बदलते. इकडे लैला मजनूची परिस्थिती अशी असते की पळून जातील कुठे? खिशातले पैसे फार दिवस पुरत नाहीत आणि कुठेतरी दोघं सापडतात. मग खरी कसोटीची वेळ येते. कारण तिथून पुढे कायद्याचं राज्य सुरू होतं. त्याचा पळून जाताना मुलामुलींनी विचारच केलेला नसतो.कायद्याचा अभ्यास हवाच१. मुलावर फिर्याद होते किड्नॅपिंगची, जर का मुलगी १८ वर्षांच्या वर असेल तर परिस्थिती जरा तरी सोपी असते. कारण ती कायद्यानं सज्ञान असते. दोघांनी जर रीतसर लग्न केलं असेल, तर ते कायद्याला मान्य असतं. पण जर का मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी आणि १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर? तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध असतं. खरं म्हणजे ते लग्नच नसतं.२. अशा वेळी त्या मुलीच्या खंबीरपणावर सगळं अवलंबून असतं. जर का ती मुलगी ठामपणे असंच म्हणत राहिली, की ‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ तर त्या मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही. पण जर का ती मुलगी कुठल्या दबावाला बळी पडली, आणि असं काही म्हटली, की ‘यानं मला फूस लावली’ तर मात्र त्या मुलाची अवस्था फारच बिकट होते.३. वैद्यकीय तपासणीत त्या दोघांचे शरीरसंबंध आल्याचा निष्कर्ष निघाला, तर मात्र त्या मुलावर बलात्काराचाही आरोप होऊन केस कोर्टात गेली तर साक्षीपुराव्याने काय सिद्ध होईल हा भाग वेगळा. पण अशा प्रकारच्या आरोपांनी मनस्ताप व्हायचा तो होतोच. सगळा विषय अवलंबून असतो तो त्या मुलीच्या खंबीरपणावर, सद्सद्विवेकबुद्धीवर. तिनं जर हे मान्य केलं- ‘जे झालं ते माझ्या संमतीनं झाल’ तर तो मुलगा सुटू शकतो, नाहीतर त्याच्यावर बलात्काराचा खटला दाखल होऊ शकतो.४. अशा पळून जाऊन केलेल्या लग्नातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी असणं. कारण अशा वेळी ती मुलगी इच्छेनं जरी पळून गेली असली तरी कायद्याच्या भाषेत त्याला अपहरण म्हणतात आणि शरीरसंबंधाला संमती असली, तरीही कायद्याच्या परिभाषेत त्याला बलात्कार म्हणतात.५. एवढा उद्योग करून, धोका पत्करून एकमेकांसाठी जीव पणाला लावूनही शेवटी कायदा म्हणतो, तुमचं लग्न हे लग्न नाही.६. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची आणि मुलगा २१ वर्षांचा असल्याशिवाय या भानगडीत न पडणे हे उत्तम!