शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

सज्ञान असलात, तरच लग्नाच्या भानगडीत पडा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:55 IST

..नाहीतर किडनॅपिंग आणि प्रसंगी बलात्काराच्या आरोपालाही मुलांना सामोरं जावं लागू शकतं

ठळक मुद्देमुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी, पण १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध ठरू शकतं.‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ असं जर मुलीनं ठामपणे सांगितलं तरच मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही.लग्न करताना मुलगा आणि मुलगी दोघांनीही सज्ञान असणंच आवश्यक.

प्रेमानं दोघांवर अक्षरश: गारुड केलेलं असतं. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं, पण घरच्यांपुढे गाडी अडलेली असते.आणि बघता बघता एक दिवस जोडी नौ दो ग्यारह होते...मग दोघांच्या घरचे शोधाशोध सुरू करतात. कॉलेज, नातेवाईक, मित्रमैत्रिणी अशा ठिकाणी शोधाशोध सुरू झाली, की साहजिकच पालक पोलीस स्टेशनला जातात आणि फिर्याद कसली नोंदवतात, तर माझ्या मुलीला कोणीतरी/अमुक मुलानं पळवून नेलं.’आणि मग तपासाची दिशाच बदलते. इकडे लैला मजनूची परिस्थिती अशी असते की पळून जातील कुठे? खिशातले पैसे फार दिवस पुरत नाहीत आणि कुठेतरी दोघं सापडतात. मग खरी कसोटीची वेळ येते. कारण तिथून पुढे कायद्याचं राज्य सुरू होतं. त्याचा पळून जाताना मुलामुलींनी विचारच केलेला नसतो.कायद्याचा अभ्यास हवाच१. मुलावर फिर्याद होते किड्नॅपिंगची, जर का मुलगी १८ वर्षांच्या वर असेल तर परिस्थिती जरा तरी सोपी असते. कारण ती कायद्यानं सज्ञान असते. दोघांनी जर रीतसर लग्न केलं असेल, तर ते कायद्याला मान्य असतं. पण जर का मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी आणि १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर? तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध असतं. खरं म्हणजे ते लग्नच नसतं.२. अशा वेळी त्या मुलीच्या खंबीरपणावर सगळं अवलंबून असतं. जर का ती मुलगी ठामपणे असंच म्हणत राहिली, की ‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ तर त्या मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही. पण जर का ती मुलगी कुठल्या दबावाला बळी पडली, आणि असं काही म्हटली, की ‘यानं मला फूस लावली’ तर मात्र त्या मुलाची अवस्था फारच बिकट होते.३. वैद्यकीय तपासणीत त्या दोघांचे शरीरसंबंध आल्याचा निष्कर्ष निघाला, तर मात्र त्या मुलावर बलात्काराचाही आरोप होऊन केस कोर्टात गेली तर साक्षीपुराव्याने काय सिद्ध होईल हा भाग वेगळा. पण अशा प्रकारच्या आरोपांनी मनस्ताप व्हायचा तो होतोच. सगळा विषय अवलंबून असतो तो त्या मुलीच्या खंबीरपणावर, सद्सद्विवेकबुद्धीवर. तिनं जर हे मान्य केलं- ‘जे झालं ते माझ्या संमतीनं झाल’ तर तो मुलगा सुटू शकतो, नाहीतर त्याच्यावर बलात्काराचा खटला दाखल होऊ शकतो.४. अशा पळून जाऊन केलेल्या लग्नातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी असणं. कारण अशा वेळी ती मुलगी इच्छेनं जरी पळून गेली असली तरी कायद्याच्या भाषेत त्याला अपहरण म्हणतात आणि शरीरसंबंधाला संमती असली, तरीही कायद्याच्या परिभाषेत त्याला बलात्कार म्हणतात.५. एवढा उद्योग करून, धोका पत्करून एकमेकांसाठी जीव पणाला लावूनही शेवटी कायदा म्हणतो, तुमचं लग्न हे लग्न नाही.६. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची आणि मुलगा २१ वर्षांचा असल्याशिवाय या भानगडीत न पडणे हे उत्तम!