शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मुलांच्या मनातला भावनांचा कल्लोळ शांत कसा कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:41 IST

मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी या काही क्लृप्त्या..

ठळक मुद्देफ्रस्ट्रेशन, नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.

- मयूर पठाडेलहान लहान मुलं.. अगदी शाळकरी, पण तरीही त्यांच्याही मनात भावनांचा कायमच कल्लोळ असतो. आजकालच्या फास्ट आणि अभासी जगात तर भावनांचा हा गुंता अधिकच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.आपल्याला वाटतं, मुलं लहान आहेत, त्यांना कसलं आलंय टेन्शन आणि चिंता, पण खरं तर या वयातलं टेन्शन आणि त्यांच्या भावनांचा निचरा योग्य वेळीच केला गेला नाही, तर पुढे आयुष्यभर या गोष्टी त्यांना त्रास देतात आणि याच ठिसूळ पायावर त्यांची भविष्याची इमारत उभी राहते, त्यामुळे मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्सकडे अधिक गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढवायचा, हे आपण गेल्या भागात पाहिलं, या भागात त्याविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी..१- आजकाल कोणतीही मुलं पाहा, ती पटकन चिडतात, लगेच इमोशनल होतात, काही आपल्याशीच कुढतात, तर काही आदळआपट करतात.. त्यांच्यातल्या वागणुकीचाच बदल पालकांना लक्षात येतोच, पण त्यावर आपणही काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा कल्लोळ शांत कसा करता येईल याकडे आधी लक्ष द्यायला हवं. डिप ब्रिदिंग, एक ते शंभर आकडे मोजणं, त्या वातावरणातून थोडा वेळ त्यांना बाहेर नेणं.. यासारख्या गोष्टींनी आपल्या भावनांवर कंट्रोल करणं त्यांना शिकवता येईल.२- फ्रस्ट्रेशन, नैराश्य प्रत्येकालाच येतं, पण त्यावरची प्रतिक्रिया नकारात्मकच असली पाहिजे असं नाही. हे नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.३- प्रश्नांच्या भोवºयात गिरक्या मारत राहण्यापेक्षा हे प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, त्यातून कसं बाहेर पडता येईल हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.४- प्रत्येक टप्प्यावर आपला आपल्याशी संवादही महत्त्वाचा असतो. स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.५- भावभावनांचा सामना करताना काही क्लृप्त्याही वापरता येतील. प्रत्येक वेळी आपणच जिंूक किंवा हरू असं होत नाही. ‘विन-विन’ सिच्युएशन मात्र प्रत्येक वेळी आणता येते. ही परिस्थिती कशी आणता येईल याचं भान मुलांना आलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या भावना हाताळू शकतील.