शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

मूल शाळेत दंगा करतं, भांडतं?-घरात तुम्ही त्याच्याशी तसंच तर वागत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:48 IST

पालकांचं मुलांशी वागणं, मूल घरात आनंदी असणं त्याच्या सोशल होण्यात मोठी भूमिका बजावतं.

ठळक मुद्देनॉर्वेत प्रसिद्ध झालेला एक अभ्यास म्हणतो की, मूल घरातलं वातावरण शाळेत घेऊन जातं.

घरातलं पालकांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं परस्परांवर असलेलं नसलेलं प्रेम, भांडणं, चर्चा, निकोप वातावरण, मोकळेपणा यासार्‍याचा मुलांच्या वागण्यावर, मनावर परिणाम होतो हे तर उघड आहे. पण आता एक नवीन अभ्यास सांगतो आहे की, घरातलं हेच वातावरण मुलं शाळेत घेऊन जातात आणि इतर मुलांशी आणि शिक्षकांशी बोलताना, भांडताना, जमवून घेताना त्यासार्‍याचा फार मोठा परिणाम मुलांवर होत असतो. नॉर्वेअन विद्यापीठाच्या सायस आणि टेक्नॉलॉजी शाखेंतर्गत मानसशास्त्रात पीएचडीचा अभ्यास करणार्‍या बीट डब्ल्यू हेगन यांचा एक महत्वाचा अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाला आहे.

त्यात हेगम म्हणतात की, मुलं शाळेत बरंच काही शिकतात हे मान्य. शाळेत शिकण्यासाठीच आपण त्यांना पाठवतो. पण तिथं ते कसं जमवून घेतात याचा पाया घरातच घातला जातो. ज्या काळात घरात मुलांचं आईबाबांशी, भावंडांशी, नातलगांशी पटतं, त्यांना सुरक्षित वाटतं तेव्हा ते शाळेत मित्रांशी, शिक्षकांशी उत्तम वागतात. त्याचा रॅपो चांगला असतो, ते प्रेमानं सगळ्यांत मिसळतात. त्याकाळात त्यांच्यातलं लव्ह हार्मोन उत्तम काम करतं. मात्र तसं नसेल तर मुलं शाळेत दंगा करतात, मारामार्‍या करतात, अभ्यासात लक्ष नसतं, शिक्षकांशी पटत नाही. त्यामुळे घरात मुलांना सुरक्षित वाटणं, प्रेम मिळणं, आनंदी राहणं हे त्यांच्या सोशल होण्यात मोठं फायदेशीर ठरतं, असं हा अभ्यास सांगतो.