शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

प्रेमात पडलात, पण तडजोडीची तयारी आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:47 IST

तडजोडीतून मार्ग काढायची दोघांचीही तयारी असेल, तर आयुष्य होईल अधिक अर्थपूर्ण

ठळक मुद्देकिती गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि किती गोष्टी सोडून द्याव्या लागतील याचाही अंदाज हवा.आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेमाचा पाया पक्का हवा.ताण सहन करण्याची क्षमता हवी.

लग्न हा प्रत्येकासाठीच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तितक्याच जाणीवपूर्वक तो हाताळायला हवा. बºयाचदा प्रेमात पडलेले तरुण त्याकडे अगदीच लाइटली बघतात आणि मग नंतर प्रश्न निर्माण होतात.त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यातली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तडजोड. ती करायची तुमची तयारी असेल, तर तुमचं आयुष्य अधिक रोमॅँटिक आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. अर्थात ही तडजोड दोघांनीही करणं गरजेचं आहे.१. प्रेमी जिवांना इतरांपेक्षा खूप जास्त विरोध सहन करावा लागतो. त्यातून जर ते पळून गेलेच तर घरच्यांबरोबरच दोन्हीकडच्या समाजाचाही ते रोष ओढवून घेतात आणि या सगळ्याचा ताण सहन करणं दोघांनाही अवघड व्हायला लागतं. हा ताण सहन करण्याची क्षमता तुमच्यात हवी.२. अशातच लग्नापूर्वी न दिसलेल्या अनेक सवयी, चालीरिती लग्न करून एकत्र राहायला लागलं की जाणवायला, टोचायला लागतात. कारण प्रत्येक घराची, जातीची, धर्माची स्वत:ची एक संस्कृती असते. ती काही बाबतीत जुळते. काही बाबतीत जुळवून घ्यावी लागते आणि काही बाबतीत मात्र जुळवून घेणंही अवघड व्हायला लागतं. आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.३. असे विवाह यशस्वी झाल्याचीही उदाहरणं खूप असतात. पण तो विवाह यशस्वी करण्यासाठी त्या दोघांना किती गोष्टीत तडजोड करायला लागलेली असते, किती गोष्टी सोडून द्याव्या लागलेल्या असतात, किती स्वीकाराव्या लागलेल्या असतात ते त्या दोघांनाच माहिती असतं. त्यामुळे तडजोडीला पर्याय नाही.४. कुठल्याही प्रेमविवाहात सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नांमध्ये जास्तच महत्त्वाची ठरते. ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम. कारण तो पाया पक्का नसेल, तर परिस्थिती निभावणं अजूनच अवघड होऊन बसतं. यावर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे वेगळ्या जाती-धर्माच्या जोडीदाराच्या कुटुंबाची जीवनपद्धती, त्यातल्या चालीरिती, सवयी याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणं. यापैकी कशाचा आपल्याला त्रास होऊ शकतो याचा अंदाज घेणं. त्यातलं काय बदलता येईल त्याबद्दल जोडीदाराशी बोलणं..या गोष्टी करायलाच हव्यात. तरच असे विवाह यशस्वी होऊ शकतात.