शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडलात, पण तडजोडीची तयारी आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:47 IST

तडजोडीतून मार्ग काढायची दोघांचीही तयारी असेल, तर आयुष्य होईल अधिक अर्थपूर्ण

ठळक मुद्देकिती गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि किती गोष्टी सोडून द्याव्या लागतील याचाही अंदाज हवा.आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेमाचा पाया पक्का हवा.ताण सहन करण्याची क्षमता हवी.

लग्न हा प्रत्येकासाठीच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तितक्याच जाणीवपूर्वक तो हाताळायला हवा. बºयाचदा प्रेमात पडलेले तरुण त्याकडे अगदीच लाइटली बघतात आणि मग नंतर प्रश्न निर्माण होतात.त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यातली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तडजोड. ती करायची तुमची तयारी असेल, तर तुमचं आयुष्य अधिक रोमॅँटिक आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. अर्थात ही तडजोड दोघांनीही करणं गरजेचं आहे.१. प्रेमी जिवांना इतरांपेक्षा खूप जास्त विरोध सहन करावा लागतो. त्यातून जर ते पळून गेलेच तर घरच्यांबरोबरच दोन्हीकडच्या समाजाचाही ते रोष ओढवून घेतात आणि या सगळ्याचा ताण सहन करणं दोघांनाही अवघड व्हायला लागतं. हा ताण सहन करण्याची क्षमता तुमच्यात हवी.२. अशातच लग्नापूर्वी न दिसलेल्या अनेक सवयी, चालीरिती लग्न करून एकत्र राहायला लागलं की जाणवायला, टोचायला लागतात. कारण प्रत्येक घराची, जातीची, धर्माची स्वत:ची एक संस्कृती असते. ती काही बाबतीत जुळते. काही बाबतीत जुळवून घ्यावी लागते आणि काही बाबतीत मात्र जुळवून घेणंही अवघड व्हायला लागतं. आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.३. असे विवाह यशस्वी झाल्याचीही उदाहरणं खूप असतात. पण तो विवाह यशस्वी करण्यासाठी त्या दोघांना किती गोष्टीत तडजोड करायला लागलेली असते, किती गोष्टी सोडून द्याव्या लागलेल्या असतात, किती स्वीकाराव्या लागलेल्या असतात ते त्या दोघांनाच माहिती असतं. त्यामुळे तडजोडीला पर्याय नाही.४. कुठल्याही प्रेमविवाहात सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नांमध्ये जास्तच महत्त्वाची ठरते. ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम. कारण तो पाया पक्का नसेल, तर परिस्थिती निभावणं अजूनच अवघड होऊन बसतं. यावर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे वेगळ्या जाती-धर्माच्या जोडीदाराच्या कुटुंबाची जीवनपद्धती, त्यातल्या चालीरिती, सवयी याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणं. यापैकी कशाचा आपल्याला त्रास होऊ शकतो याचा अंदाज घेणं. त्यातलं काय बदलता येईल त्याबद्दल जोडीदाराशी बोलणं..या गोष्टी करायलाच हव्यात. तरच असे विवाह यशस्वी होऊ शकतात.