शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

मुलं हुशार आहेत, पण त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:38 IST

पालक म्हणून ही एक जबाबदारीही आपल्याला पार पाडावी लागेलच..

ठळक मुद्देमुलांच्या भावनांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे.मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.मुलांनी त्यांच्या भावनांबाबत मोकळेपणी पालकांशी बोलावं यासाठीचं वातावरण मुलांना उपलब्ध करुन द्यायला हवं.

- मयूर पठाडेमुलांसाठी काय करायचं आपण बाकी ठेवतो? मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी पालक त्यांना जे जे शक्य असेल, ते ते सारं काही करतात, इतकंच काय, जे अशक्य तेही शक्य करण्याचा प्रयत्न करतात..पालकांच्या या प्रयत्नांचं यश बºयाचा मुलांच्या कर्तबगारीत दिसतंही. मुलं हुशार होतात, अनेक क्षेत्रात ते भराºया मारतात, त्यात निसंशय पालकांच्या कर्तव्याचा आणि त्यांच्या मेहनतीचा वाटा मोठाच असतो..पण बºयाचदा मुलं कमी पडतात, ते आपल्या भावभावनांवर कंट्रोल ठेवण्यात. या भावना कशा हाताळायच्या हेच त्यांना कळत नाही. आजकाल तरुण मुलांच्या आत्महत्त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्यामागेही भावनांचा हाच गोंधळ कारणीभूत आहे. आपल्या भावना कशा हाताळायच्या याचं शिक्षणच त्यांना मिळत नाही किंवा त्यात ते कमी पडतात.आपला इमोशल इंटेलिजन्स वाढावा यासाठी मुलांनी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्यासाठी पालकांनीही त्यांना मदत केली पाहिजे.इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी काय कराल?१- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलं कोणत्याह्ी पद्धतीनं रिअ‍ॅक्ट झाली, आपल्या भावनांचा त्यांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्यानं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया का दिली आणि त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न.. या गोष्टी त्यानंतर. पण पहिल्यांदा मुलांच्या इमोशन्स समजून घ्या.२- काही वेळा मुलांनाच आपण भावनांच्या कोणत्या जंजाळात अडकलो आहोत, हे समजत नाही किंवा त्याविषयी ते कुणाशी बोलत नाहीत. अशा वेळी, ‘तुझा आज मूड नाही का? तू आज अपसेट का दिसतो आहेस?, कसली चिंता तुला वाटते आहे?..’ अशा पद्धतीनं मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.३- आपल्या मुलांनी त्यांच्या भावनांबाबत पालकांशी बोलावं यासाठी त्यांना कायम प्रोत्साहित करायला हवं.४- अनेकदा आपण आपलाच विचार करतो, पण त्याच परिस्थितीचा दुसरा व्यक्ती कसा विचार करीत असेल, त्याला काय वाटत असेल, याचा विचारच आपण करीत नाही. दुसºयाच्या भावनांना समजून घेण्याचा परकाया प्रवेश मुलांना साधता आला तर आपल्याही भावनांवर ते उत्तम नियंत्रण ठेऊ शकतात.५- मुलांमध्ये कुठल्याही कारणानं टेन्शन निर्माण होतंय, ते अपसेट दिसताहेत, हे लक्षात आल्याबरोबर मुलांशी संवाद साधून हे टेन्शन कमी करण्यात जर पालकांचाही हातभार असेल तर पालक आणि मुलं यांच्यातील भावनांचा बंध तर अधिक अतूट होतोच, पण मुलंही अनावश्यक टेन्शनपासून वाचतात.मुलांमधील इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याचे आणखीही काही उपाय आहेत, त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..