शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मुलं हुशार आहेत, पण त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:38 IST

पालक म्हणून ही एक जबाबदारीही आपल्याला पार पाडावी लागेलच..

ठळक मुद्देमुलांच्या भावनांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे.मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.मुलांनी त्यांच्या भावनांबाबत मोकळेपणी पालकांशी बोलावं यासाठीचं वातावरण मुलांना उपलब्ध करुन द्यायला हवं.

- मयूर पठाडेमुलांसाठी काय करायचं आपण बाकी ठेवतो? मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी पालक त्यांना जे जे शक्य असेल, ते ते सारं काही करतात, इतकंच काय, जे अशक्य तेही शक्य करण्याचा प्रयत्न करतात..पालकांच्या या प्रयत्नांचं यश बºयाचा मुलांच्या कर्तबगारीत दिसतंही. मुलं हुशार होतात, अनेक क्षेत्रात ते भराºया मारतात, त्यात निसंशय पालकांच्या कर्तव्याचा आणि त्यांच्या मेहनतीचा वाटा मोठाच असतो..पण बºयाचदा मुलं कमी पडतात, ते आपल्या भावभावनांवर कंट्रोल ठेवण्यात. या भावना कशा हाताळायच्या हेच त्यांना कळत नाही. आजकाल तरुण मुलांच्या आत्महत्त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्यामागेही भावनांचा हाच गोंधळ कारणीभूत आहे. आपल्या भावना कशा हाताळायच्या याचं शिक्षणच त्यांना मिळत नाही किंवा त्यात ते कमी पडतात.आपला इमोशल इंटेलिजन्स वाढावा यासाठी मुलांनी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्यासाठी पालकांनीही त्यांना मदत केली पाहिजे.इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी काय कराल?१- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलं कोणत्याह्ी पद्धतीनं रिअ‍ॅक्ट झाली, आपल्या भावनांचा त्यांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्यानं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया का दिली आणि त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न.. या गोष्टी त्यानंतर. पण पहिल्यांदा मुलांच्या इमोशन्स समजून घ्या.२- काही वेळा मुलांनाच आपण भावनांच्या कोणत्या जंजाळात अडकलो आहोत, हे समजत नाही किंवा त्याविषयी ते कुणाशी बोलत नाहीत. अशा वेळी, ‘तुझा आज मूड नाही का? तू आज अपसेट का दिसतो आहेस?, कसली चिंता तुला वाटते आहे?..’ अशा पद्धतीनं मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.३- आपल्या मुलांनी त्यांच्या भावनांबाबत पालकांशी बोलावं यासाठी त्यांना कायम प्रोत्साहित करायला हवं.४- अनेकदा आपण आपलाच विचार करतो, पण त्याच परिस्थितीचा दुसरा व्यक्ती कसा विचार करीत असेल, त्याला काय वाटत असेल, याचा विचारच आपण करीत नाही. दुसºयाच्या भावनांना समजून घेण्याचा परकाया प्रवेश मुलांना साधता आला तर आपल्याही भावनांवर ते उत्तम नियंत्रण ठेऊ शकतात.५- मुलांमध्ये कुठल्याही कारणानं टेन्शन निर्माण होतंय, ते अपसेट दिसताहेत, हे लक्षात आल्याबरोबर मुलांशी संवाद साधून हे टेन्शन कमी करण्यात जर पालकांचाही हातभार असेल तर पालक आणि मुलं यांच्यातील भावनांचा बंध तर अधिक अतूट होतोच, पण मुलंही अनावश्यक टेन्शनपासून वाचतात.मुलांमधील इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याचे आणखीही काही उपाय आहेत, त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..