शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

ब्रेकअप तर केलं, आता पुढे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:30 IST

जमत नाही किंवा पुढे जमणार नाही म्हणून एकतर्फी ब्रेकअपचा निर्णय घेताय?

ठळक मुद्देब्रेकअप करुन नवीन नात्याचा विचार करताना आपण निर्णय कसे घेतोय हे देखील महत्वाचं आहेच.

-योगिता तोडकर 

संजनाचे तीन वर्षे एका मुलावर प्रेम होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण तिने अनेकदा चर्चा, विनंती करूनही तो तिला अजिबात विशेष वेळ द्यायचा नाही. शेवटी कंटाळून तिने एकटीने त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घरातल्यांशी चर्चा केली व घरातल्यांनी पाहिलेल्या मुलाशी साखरपुडा केला. तिच्या म्हणण्यानुसार आज ती नवीन मुलाबरोबर आनंदी आहे पण आधीच्या नात्याला  विसरू शकत नाहीये.

आता प्रश्न असा आहे, संजनाने घेतलेला निर्णय बरोबर आहे का? ती तो निभावू शकणार का? आणि कसा?

मुळात असे निर्णय चूक की बरोबर हे ठरवायला मिळणे कठीणच आणि  चूक असल्यास ते दुरुस्त करता येणं अवघड आणि आव्हानात्मकपण. तिच्याशी बोलताना जाणवतं की तिनं  घेतलेल्या  निर्णयामागे कुठेतरी नैराश्य होते.

निर्णय घेताना संजनाने तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या.

 एकतर ते नातं दोघांमध्ये असल्यामुळे तिने परस्पर एकटीने निर्णय घेणं योग्य नव्हतं. त्या मुलाशी चर्चा करून त्याला कल्पना द्यायला हवी होती की चालू परिस्थिती अशीच पुढे जात राहिली तर हे नातं निभावणं तिला अवघड होईल. त्याने त्याच्यामध्ये ते बदल आणण्यासाठी चर्चेनंतर तिने त्याला ठराविक वेळ द्यायला पाहिजे होता.

दुसरी गोष्ट आपल्या निर्णयामध्ये नेमकी कोणती जोखीम आहे हे तिने लक्षात घ्यायला पाहिजे होते. कारण तिच्या या एका निर्णयामध्ये तीन लोकांची आयुष्य गुंतलेली आहेत. ती नेमके काय करत आहे याबाबतीत तिच्या विचारांची सुस्पष्टता तिला हवी. 

तिसरी न सगळ्यात महत्वाची गोष्ट या निर्णयातली निश्चितता / अनिश्चितता  लक्षात घेणं. आज तिने साखरपुडा केल्यानंतर ती आधीच्या मुलाला विसरू शकत नाही, यामुळे ती स्वतर्‍ला दोष देत राहणार. मग ती मनाने शंभर टक्के ना आधीच्या मुलाबरोबर ना आत्ताच्या मुलाबरोबर. अशा परिस्थितीत ती नवीन नात्यात एकरूप होणार कशी ते नातं निभावून  नेणार कशी?

हे सगळे लक्षात न घेता, संजनाने जरी निर्णय घेतला असला तरी  तिच्यासमोर असणारा दुसरा उत्तम उपाय म्हणजे आयुष्यात आधी घडलेल्या गोष्टींमागं न धावता नवीन नात्याला पूर्णपणे सांभाळणे व स्वतर्‍ला सावरणं. कारण आधीचं नातं ती मागे सोडून आलीये व त्या आठवणींमध्ये नवीन नातं भरडून गेलं तर मोठं नैराश्यच पदरी पडेल. त्यामुळे आधीचं नातं सांभाळताना झालेल्या चुका अथवा मनाला त्रास देऊन गेलेल्या घडामोडी परत कशा घडणार नाहीत याची काळजी घेऊन येणारं नवीन आयुष्य प्रफुल्लित बनवणं. निर्णय घेताना यासार्‍याचा विचार करायला हवा.

( लेखिका समुपदेशक आहेत.)