शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

खोट्टारडा कुठला!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:09 IST

मुलांवर कुठलंही लेबल लावण्याआधी थांबा.. खोटं बोलण्याची सुरुवात कुठून होते आहे ते आधी तपासा..

ठळक मुद्देमुलाला कधीच घालूनापाडून बोलू नका.खरं बोलण्याचे संस्कार घरातूनच झाले पाहिजेत.मुलांवरचं आपलं प्रेम निरपेक्ष आहे हे मुलांना कळलं पाहिजे.‘आहेसच तू खोटारडा’ अशी लेबलं मुलांवर लावू नयेत.

- मयूर पठाडेमुलांनी नेहेमी खरं बोलावं, खोटेपणाचा आधार घेऊन कधीच कोणाला शेंड्या लावू नयेत किंवा तशी सवय त्यांना लागू नये यासाठी आपण पालक म्हणून बरीच काळजी घेत असतो. तरीही मुलं खोटं बोलायची थांबत नाहीत किंबहुना खोटं बोलायची त्यांची सवय दिवसेंदिवस वाढतच जाते. मुलांना त्यांबद्दल कितीही रागवा, टोचून बोला, पण तेवढ्यापुरतं ते ऐकतात, पुन्हा येरे माझ्या मागल्या!का होतं असं?मुलं का खोटं बोलतात? इतक्या वेळेस सांगूनही ते का ऐकत नाहीत किंवा त्यांच्या ते पचनी का पडत नाही..खरंतर यासंदर्भात मुलांना रागवून आणि त्यांना घालूनपाडून बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण बºयाचदा हे खोटं बोलणं ते घरूनच शिकलेले असतात!मुलांनी खोटं बोलू नये यासाठी काय करायला हवं?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात नेहमी खरंच बोललं जातं, त्या घरातले पालक आणि मुलं यांच्यातील नात्याचे बंध नेहमीच पक्के असतात. त्यांच्यातील जवळीकही अधिक असते.२- घरात वडीलधारी मंडळीच प्रसंगपरत्वे खोटं बोलत असतात. असते ती छोटीशी गोष्ट, पण मुलांच्या मनावर ते ठसतं.३- साधी गोष्ट.. फोनवर किंवा कोणी आपल्याकडे आलं असल्यास मुलालाच सांगितलं जातं, ‘सांग त्यांना, बाबा घरी नाहीत म्हणून!’ हाच ‘संस्कार’ पुढे मुलांवर होतो.४- खरं बोलण्याचा संस्कार घरातूनच झालेला असल्यास मुलं खोटं बोलण्याच्या नादी फारसं लागत नाहीत, पण समजा एखाद्या वेळी बोललंच मूल खोटं, तर लगेच त्याच्यावर ‘तू खोटारडा’ आहेस’ असं लेबल लावू नका. त्यानं उलटाच परिणाम होईल.५- मुलांवरती आपलं प्रेम निरपेक्ष आहे, कुठल्याही अटींवर ते अवलंबून नाही, हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून समजलं पाहिजे. तू कसाही असलास तरी आमचा आहे, आम्हाला हवा आहेस, हे मुलांना कळलं तर खोट्याचा सहारा ते घेणार नाहीत.६- आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आपलं मूल कधीच खोटं बोलणार नाही, असा अनेक पालकांना अति आत्मविश्वास असतो. त्यामुळे मूल खोटं बोलत असलं तरी ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते. वास्तव स्वीकारून मुलाला जर नीट समजावून सांगितलं तर नक्कीच त्यांची ही सवय सुटू शकते.