शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

खोट्टारडा कुठला!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:09 IST

मुलांवर कुठलंही लेबल लावण्याआधी थांबा.. खोटं बोलण्याची सुरुवात कुठून होते आहे ते आधी तपासा..

ठळक मुद्देमुलाला कधीच घालूनापाडून बोलू नका.खरं बोलण्याचे संस्कार घरातूनच झाले पाहिजेत.मुलांवरचं आपलं प्रेम निरपेक्ष आहे हे मुलांना कळलं पाहिजे.‘आहेसच तू खोटारडा’ अशी लेबलं मुलांवर लावू नयेत.

- मयूर पठाडेमुलांनी नेहेमी खरं बोलावं, खोटेपणाचा आधार घेऊन कधीच कोणाला शेंड्या लावू नयेत किंवा तशी सवय त्यांना लागू नये यासाठी आपण पालक म्हणून बरीच काळजी घेत असतो. तरीही मुलं खोटं बोलायची थांबत नाहीत किंबहुना खोटं बोलायची त्यांची सवय दिवसेंदिवस वाढतच जाते. मुलांना त्यांबद्दल कितीही रागवा, टोचून बोला, पण तेवढ्यापुरतं ते ऐकतात, पुन्हा येरे माझ्या मागल्या!का होतं असं?मुलं का खोटं बोलतात? इतक्या वेळेस सांगूनही ते का ऐकत नाहीत किंवा त्यांच्या ते पचनी का पडत नाही..खरंतर यासंदर्भात मुलांना रागवून आणि त्यांना घालूनपाडून बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण बºयाचदा हे खोटं बोलणं ते घरूनच शिकलेले असतात!मुलांनी खोटं बोलू नये यासाठी काय करायला हवं?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात नेहमी खरंच बोललं जातं, त्या घरातले पालक आणि मुलं यांच्यातील नात्याचे बंध नेहमीच पक्के असतात. त्यांच्यातील जवळीकही अधिक असते.२- घरात वडीलधारी मंडळीच प्रसंगपरत्वे खोटं बोलत असतात. असते ती छोटीशी गोष्ट, पण मुलांच्या मनावर ते ठसतं.३- साधी गोष्ट.. फोनवर किंवा कोणी आपल्याकडे आलं असल्यास मुलालाच सांगितलं जातं, ‘सांग त्यांना, बाबा घरी नाहीत म्हणून!’ हाच ‘संस्कार’ पुढे मुलांवर होतो.४- खरं बोलण्याचा संस्कार घरातूनच झालेला असल्यास मुलं खोटं बोलण्याच्या नादी फारसं लागत नाहीत, पण समजा एखाद्या वेळी बोललंच मूल खोटं, तर लगेच त्याच्यावर ‘तू खोटारडा’ आहेस’ असं लेबल लावू नका. त्यानं उलटाच परिणाम होईल.५- मुलांवरती आपलं प्रेम निरपेक्ष आहे, कुठल्याही अटींवर ते अवलंबून नाही, हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून समजलं पाहिजे. तू कसाही असलास तरी आमचा आहे, आम्हाला हवा आहेस, हे मुलांना कळलं तर खोट्याचा सहारा ते घेणार नाहीत.६- आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आपलं मूल कधीच खोटं बोलणार नाही, असा अनेक पालकांना अति आत्मविश्वास असतो. त्यामुळे मूल खोटं बोलत असलं तरी ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते. वास्तव स्वीकारून मुलाला जर नीट समजावून सांगितलं तर नक्कीच त्यांची ही सवय सुटू शकते.