शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

तरुण अभियंत्यामुळे घाटरस्ता लवकर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

राजापूर : दरड कोसळून आणि महापुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. त्यात राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाचाही ...

राजापूर : दरड कोसळून आणि महापुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. त्यात राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाचाही समावेश होता. या घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या वाटा बंद झाल्यामुळे भाजीपाला, दूध, पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तरुण अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी अणुस्कुरा घाटात अखंड काम करुन हा मार्ग दोन दिवसात मोकळा केला. त्यामुळे महत्त्वाच्या वाहतुकीला खूप मोठा आधार मिळाला.

दि. २२ जुलैचा महाप्रलयंकारी पाऊस आणि त्यामुळे आलेल्या महापुराने लोक गर्भगळीत झालेले असताना तालुक्यातील एकमेव अणुस्कुरा घाटात तीन दरडी कोसळल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले. कोल्हापूरशी संपर्क असलेले अनेक घाट दरडी कोसळल्याने ठप्प झाले. यामुळे कोल्हापूर, मलकापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचा संपर्कच खंडित झाला. त्यामुळे जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलची तीव्र टंचाई निर्माण झाली.

अशा कसोटीच्या क्षणी स्वप्नील बावधनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असुरक्षित स्थितीतही अणुस्कुरा घाटात धाव घेतली. घाटातील धोकादायक कठड्यांवर आणि दरडी कोसळत असलेल्या ठिकाणी उभे राहून त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने घाटरस्ता मोकळा करण्यास सुरूवात केली. या टीमने केलेल्या दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांमुळे घाटातून प्रथम एकेरी व नंतर दुहेरी वाहतूक सुरू झाली. त्याचा खूप मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला.