शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

पिंंपळवाडी पाटबंधारे प्रकल्पाचे काम अपूर्णच

By admin | Updated: April 14, 2016 19:52 IST

तेहतीस वर्षांची प्रतीक्षा... : पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

रत्नागिरी : पिंंपळवाडी (खोपी) पाटबंधारे प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. ३३ वर्षांपूर्वी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही हे धरण अपूर्ण आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली असून, कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाची ते स्वत: पाहणी करणार आहेत. या धरणाचे काम १९८० साली सुरू करण्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ५ कोटी २१ लाखांची प्रशासकीय मान्यताही मिळाली. १९८२ - ८३ साली या प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन प्रकल्पाच्या किमतीत २३ कोटी ८७ लाख इतकी वाढ करण्यात आली.सन १९९९ - २०००मध्ये प्रकल्पाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करून ही रक्कम ४६ कोटी ९० लाख करण्यात आली. २००७ - ०८मध्ये तृतीय सुधारणा करून रक्कम ८७ कोटी इतकी करण्यात आली. या प्रकल्पावर आतापर्यंत ७५ कोटी रुपये खर्च झाले असून, ३३ वर्षांच्या कालावधीनंतरही प्रकल्पाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. उजवा कालवा २२ किलोमीटरचा आणि डावा कालवा २० किलोमीटरचा आहे. यापैकी अद्याप फक्त ६ किलोमीटरपर्यंतचेच काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. या प्रकल्पामधून ३०० मेगावॅट विद्युत प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार होती. परंतु हा प्रकल्पही अपूर्ण आहे. यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष अनंत भोसले, मुख्य कार्यवाह देवराम भोसले, कार्याध्यक्ष प्रमोद भोसले यांनी मंगळवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी तहसीलदार अमोल कदम, उपसचिव बेलसरे, सहाय्यक अभियंता अरुण काळोखे, रा. बा. क्षीरसागर आदी उपस्थित होते. डाव्या व उजव्या कालव्यांची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आग्रह धरला. धरण पूर्ण करून शेतीच्या सिंंचनासाठी पाणी द्यावे व सातगावातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, विद्युत प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करावी. खेड तालुक्याला विद्युत भारनियमनातून मुक्त करावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे या प्रकल्पातील शेकडो धरणग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे शिष्टमंडळाने राज्यमंत्री वायकर यांच्या निदर्शनास आणून दिले.याची गंभीर दखल घेत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अपूर्ण कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर या प्रकल्पाची स्वत पाहणी करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री वायकर यांनी शिष्टमंडळास दिले. (प्रतिनिधी)