शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

पिंंपळवाडी पाटबंधारे प्रकल्पाचे काम अपूर्णच

By admin | Updated: April 14, 2016 19:52 IST

तेहतीस वर्षांची प्रतीक्षा... : पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

रत्नागिरी : पिंंपळवाडी (खोपी) पाटबंधारे प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. ३३ वर्षांपूर्वी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही हे धरण अपूर्ण आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली असून, कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाची ते स्वत: पाहणी करणार आहेत. या धरणाचे काम १९८० साली सुरू करण्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ५ कोटी २१ लाखांची प्रशासकीय मान्यताही मिळाली. १९८२ - ८३ साली या प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन प्रकल्पाच्या किमतीत २३ कोटी ८७ लाख इतकी वाढ करण्यात आली.सन १९९९ - २०००मध्ये प्रकल्पाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करून ही रक्कम ४६ कोटी ९० लाख करण्यात आली. २००७ - ०८मध्ये तृतीय सुधारणा करून रक्कम ८७ कोटी इतकी करण्यात आली. या प्रकल्पावर आतापर्यंत ७५ कोटी रुपये खर्च झाले असून, ३३ वर्षांच्या कालावधीनंतरही प्रकल्पाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. उजवा कालवा २२ किलोमीटरचा आणि डावा कालवा २० किलोमीटरचा आहे. यापैकी अद्याप फक्त ६ किलोमीटरपर्यंतचेच काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. या प्रकल्पामधून ३०० मेगावॅट विद्युत प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार होती. परंतु हा प्रकल्पही अपूर्ण आहे. यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष अनंत भोसले, मुख्य कार्यवाह देवराम भोसले, कार्याध्यक्ष प्रमोद भोसले यांनी मंगळवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी तहसीलदार अमोल कदम, उपसचिव बेलसरे, सहाय्यक अभियंता अरुण काळोखे, रा. बा. क्षीरसागर आदी उपस्थित होते. डाव्या व उजव्या कालव्यांची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आग्रह धरला. धरण पूर्ण करून शेतीच्या सिंंचनासाठी पाणी द्यावे व सातगावातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, विद्युत प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करावी. खेड तालुक्याला विद्युत भारनियमनातून मुक्त करावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे या प्रकल्पातील शेकडो धरणग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे शिष्टमंडळाने राज्यमंत्री वायकर यांच्या निदर्शनास आणून दिले.याची गंभीर दखल घेत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अपूर्ण कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर या प्रकल्पाची स्वत पाहणी करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री वायकर यांनी शिष्टमंडळास दिले. (प्रतिनिधी)