शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये १८ ग्रामपंचायती शौचालयाविना

By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST

अंमलबजावणीबाबत नाराजी : जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल

श्रीकांत चाळके - खेड जिल्हाभरात बऱ्याच ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. मात्र, अशा ग्रामपंचायतींची आकडेवारी काही समाधानकारक नाही. या योजनेची अंमलबजावणी करताना राजकीय हिताकडे पाहिले गेल्याचा आरोप केला जात आहे. जिल्ह्याचे चित्र पाहिले तर ८८ ग्रामपंचायती अद्याप शौचालयाविना आहेत. खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत. निर्मल ग्राम योजना कशा पध्दतीने राबविली जाते, याचेच हे द्योतक असल्याचे मत ग्रामीण भागात व्यक्त केले जात आहे.खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार वाढलेले असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत असल्याची टीका केली जात आहे. तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जिल्ह्यात २० टक्के कुटुंब अजूनही शौचालयाविना आहेत. ही आकडेवारी ३ लाख ६४ हजार ९८० कुटुंब इतकी आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपये अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ किती व कशा प्रकारे घेतला जातो, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात बहुतांश लोकांना या योजनेची माहितीच नसल्याची बाब समोर येत आहे. जिल्ह्यातील गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत़ त्यामुळे हे दोन्ही तालुके शासन दरबारी निर्मल झाले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०२२ पर्यंत निर्मल भारत अभियानांअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच हे उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल. जिल्ह्यात दोन तालुके निर्मल. मात्र, खेडची स्थिती गंभीर.हगणदारीमुक्त गाव करण्याचा निर्धार. ग्रामपंचायतींवर अधिक लक्ष. शासनाचे अनुदान मिळाले तरी लाभाचे प्रमाण कमी.स्वच्छ आरोग्य सुंदर शहरासाठी प्रयत्न हवे.काटेकोर अंमलबजावणी गरजेची.