शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खेडमध्ये १८ ग्रामपंचायती शौचालयाविना

By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST

अंमलबजावणीबाबत नाराजी : जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल

श्रीकांत चाळके - खेड जिल्हाभरात बऱ्याच ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. मात्र, अशा ग्रामपंचायतींची आकडेवारी काही समाधानकारक नाही. या योजनेची अंमलबजावणी करताना राजकीय हिताकडे पाहिले गेल्याचा आरोप केला जात आहे. जिल्ह्याचे चित्र पाहिले तर ८८ ग्रामपंचायती अद्याप शौचालयाविना आहेत. खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत. निर्मल ग्राम योजना कशा पध्दतीने राबविली जाते, याचेच हे द्योतक असल्याचे मत ग्रामीण भागात व्यक्त केले जात आहे.खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार वाढलेले असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत असल्याची टीका केली जात आहे. तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जिल्ह्यात २० टक्के कुटुंब अजूनही शौचालयाविना आहेत. ही आकडेवारी ३ लाख ६४ हजार ९८० कुटुंब इतकी आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपये अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ किती व कशा प्रकारे घेतला जातो, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात बहुतांश लोकांना या योजनेची माहितीच नसल्याची बाब समोर येत आहे. जिल्ह्यातील गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत़ त्यामुळे हे दोन्ही तालुके शासन दरबारी निर्मल झाले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०२२ पर्यंत निर्मल भारत अभियानांअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच हे उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल. जिल्ह्यात दोन तालुके निर्मल. मात्र, खेडची स्थिती गंभीर.हगणदारीमुक्त गाव करण्याचा निर्धार. ग्रामपंचायतींवर अधिक लक्ष. शासनाचे अनुदान मिळाले तरी लाभाचे प्रमाण कमी.स्वच्छ आरोग्य सुंदर शहरासाठी प्रयत्न हवे.काटेकोर अंमलबजावणी गरजेची.