शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्याचा मारा आणि पावसाची संततधार थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर वारा आणि पावसाची संततधार थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुपारी चार वाजल्यानंतर मात्र, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

शनिवारी सायंकाळपासून तौक्ते चक्रीवादळाने जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह सलामी देण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राजापुरात दाखल झाल्यानंतर सुमारे ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या वेगाने पुढे सरकू लागले. त्यामुळे रत्नागिरी, जयगड असा प्रवास करत गुहागरकडे जाताना किनाऱ्यालगत तसेच आसपास १० किलोमीटर परिसरातील अनेक गावांना जोरदार फटका बसला. अनेक झाडे कोसळली. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने तसेच काही ठिकाणी जोरदार वाऱ्याने पोलच कोसळून पडल्याने दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर जोरदार वाऱ्याच्या माऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता.

सोमवारी सकाळीही पावसाचा जोर दिवसभर कायम राहणार असे, वाटत होते. मात्र, सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार थांबली त्याचबरोबर वाराही मंदावला. वातावरण मोकळे झाले. साडेअकरापासून सूर्यदर्शन होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी अधूनमधून गडगडाट होत होता. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात तब्बल ११८९ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १३२.११ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली असून सर्वाधिक विक्रमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात २७४ मिलीमीटर तर त्याखालोखाल राजापूर तालुक्यात २०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.