शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

वाऱ्याचा मारा आणि पावसाची संततधार थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर वारा आणि पावसाची संततधार थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुपारी चार वाजल्यानंतर मात्र, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

शनिवारी सायंकाळपासून तौक्ते चक्रीवादळाने जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह सलामी देण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राजापुरात दाखल झाल्यानंतर सुमारे ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या वेगाने पुढे सरकू लागले. त्यामुळे रत्नागिरी, जयगड असा प्रवास करत गुहागरकडे जाताना किनाऱ्यालगत तसेच आसपास १० किलोमीटर परिसरातील अनेक गावांना जोरदार फटका बसला. अनेक झाडे कोसळली. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने तसेच काही ठिकाणी जोरदार वाऱ्याने पोलच कोसळून पडल्याने दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर जोरदार वाऱ्याच्या माऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता.

सोमवारी सकाळीही पावसाचा जोर दिवसभर कायम राहणार असे, वाटत होते. मात्र, सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार थांबली त्याचबरोबर वाराही मंदावला. वातावरण मोकळे झाले. साडेअकरापासून सूर्यदर्शन होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी अधूनमधून गडगडाट होत होता. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात तब्बल ११८९ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १३२.११ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली असून सर्वाधिक विक्रमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात २७४ मिलीमीटर तर त्याखालोखाल राजापूर तालुक्यात २०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.