शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

वाऱ्याचा मारा आणि पावसाची संततधार थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर वारा आणि पावसाची संततधार थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुपारी चार वाजल्यानंतर मात्र, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

शनिवारी सायंकाळपासून तौक्ते चक्रीवादळाने जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह सलामी देण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राजापुरात दाखल झाल्यानंतर सुमारे ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या वेगाने पुढे सरकू लागले. त्यामुळे रत्नागिरी, जयगड असा प्रवास करत गुहागरकडे जाताना किनाऱ्यालगत तसेच आसपास १० किलोमीटर परिसरातील अनेक गावांना जोरदार फटका बसला. अनेक झाडे कोसळली. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने तसेच काही ठिकाणी जोरदार वाऱ्याने पोलच कोसळून पडल्याने दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर जोरदार वाऱ्याच्या माऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता.

सोमवारी सकाळीही पावसाचा जोर दिवसभर कायम राहणार असे, वाटत होते. मात्र, सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार थांबली त्याचबरोबर वाराही मंदावला. वातावरण मोकळे झाले. साडेअकरापासून सूर्यदर्शन होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी अधूनमधून गडगडाट होत होता. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात तब्बल ११८९ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १३२.११ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली असून सर्वाधिक विक्रमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात २७४ मिलीमीटर तर त्याखालोखाल राजापूर तालुक्यात २०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.