शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

लोकांचे बळी गेल्यावर कोविड रुग्णालय सुरू होणार का -अभिजित गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:32 IST

राजापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर शहरासह ग्रामीण भागात रुग्ण वाढत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. वेळेत आणि ...

राजापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर शहरासह ग्रामीण भागात रुग्ण वाढत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याने तालुक्यात ही अवस्था आहे. ओणी येथील कोविड रुग्णालय सुरू करणार हे सांगून महिना उलटला तरी ते सुरू झालेले नाही. त्यामुळे मग अशा प्रकारे लोकांचे बळी गेल्यावर हे कोविड रुग्णलय सुरू होणार का, असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. पुढील दहा दिवसांत हे रुग्णालय सुरू करावे अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा गुरव यांनी दिला आहे.

राजापूर तालुक्यावर महाविकास आघाडीचे सरकार आणि सत्तेतील शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार हे अन्याय करत असून कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने आज जनतेला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोपही गुरव यांनी केला आहे.

राजापूर तालुक्यात अगोदरच आरोग्य सुविधांची वाणवा आहे. त्यातच कोरोनाच्या काळात याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. कोरोना काळात राजापूर तालुक्यात ओणी येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे महिनाभरापूर्वी सांगण्यात आले. यासाठी आ. राजन साळवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, अद्याप हे रुग्णालय सुरू होण्याबाबत कार्यवाही नाही, नुसत्या घोषणा करून आणि निधी देऊन काय होणार, प्रत्यक्षात रुग्णालय सुरू कधी होणार, असा प्रश्न गुरव यांनी केला आहे.

आज अनेक जिल्ह्यांत आणि तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी २०० पेक्षा जास्त सेंटर आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात केवळ आठ ते दहा सेंटर दिली जातात. लसीकरण केंद्रे का वाढविली जात नाहीत, लसीचे जादा डोस का मागितले जात नाहीत, असाही प्रश्न त्यांनी केला आहे़