शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचे अर्थचक्र थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक ...

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. त्यामुळे या पंधरा दिवसांत जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा थांबणार आहे.

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या १३ हजारांच्या वर पोहोचली असून, मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या ४०० पेक्षा अधिक वाढली आहे. अजूनही काही दिवस ही संख्या वाढणार असल्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांनी कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी आवश्यक त्या नियमांचे पालन न केल्याने कोराेनाचा संसर्ग वाढला आहे. शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून बाधित होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता हा संसर्ग रोखण्यासाठीच राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सुमारे दहा महिने सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विविध उद्योग, बांधकामे, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, माॅल्स, आदी सर्व बंद होते. यामुळे या काळात या सर्व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. काही महिन्यांपूर्वीच सर्व व्यवहार नियमित होत असतानाच आता पुन्हा १५ एप्रिलपासून पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आर्थिक संकटाचा सामना करताना घायकुतीला आलेल्या या व्यावसायिकांना आता पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

त्यातच जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेरच पडू नये, यासाठी सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानेही यावेळी बंद राहणार आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे, तसेच शिमग्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाला पुन्हा लाॅकडाऊन करावे लागले. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे आर्थिक चक्र पंधरा दिवस थांबणार आहे.