शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचे अर्थचक्र थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक ...

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. त्यामुळे या पंधरा दिवसांत जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा थांबणार आहे.

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या १३ हजारांच्या वर पोहोचली असून, मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या ४०० पेक्षा अधिक वाढली आहे. अजूनही काही दिवस ही संख्या वाढणार असल्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांनी कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी आवश्यक त्या नियमांचे पालन न केल्याने कोराेनाचा संसर्ग वाढला आहे. शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून बाधित होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता हा संसर्ग रोखण्यासाठीच राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सुमारे दहा महिने सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विविध उद्योग, बांधकामे, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, माॅल्स, आदी सर्व बंद होते. यामुळे या काळात या सर्व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. काही महिन्यांपूर्वीच सर्व व्यवहार नियमित होत असतानाच आता पुन्हा १५ एप्रिलपासून पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आर्थिक संकटाचा सामना करताना घायकुतीला आलेल्या या व्यावसायिकांना आता पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

त्यातच जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेरच पडू नये, यासाठी सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानेही यावेळी बंद राहणार आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे, तसेच शिमग्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाला पुन्हा लाॅकडाऊन करावे लागले. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे आर्थिक चक्र पंधरा दिवस थांबणार आहे.