शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

जिल्ह्याचे अर्थचक्र थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक ...

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. त्यामुळे या पंधरा दिवसांत जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा थांबणार आहे.

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या १३ हजारांच्या वर पोहोचली असून, मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या ४०० पेक्षा अधिक वाढली आहे. अजूनही काही दिवस ही संख्या वाढणार असल्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांनी कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी आवश्यक त्या नियमांचे पालन न केल्याने कोराेनाचा संसर्ग वाढला आहे. शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून बाधित होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता हा संसर्ग रोखण्यासाठीच राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सुमारे दहा महिने सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विविध उद्योग, बांधकामे, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, माॅल्स, आदी सर्व बंद होते. यामुळे या काळात या सर्व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. काही महिन्यांपूर्वीच सर्व व्यवहार नियमित होत असतानाच आता पुन्हा १५ एप्रिलपासून पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आर्थिक संकटाचा सामना करताना घायकुतीला आलेल्या या व्यावसायिकांना आता पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

त्यातच जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेरच पडू नये, यासाठी सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानेही यावेळी बंद राहणार आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे, तसेच शिमग्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाला पुन्हा लाॅकडाऊन करावे लागले. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे आर्थिक चक्र पंधरा दिवस थांबणार आहे.