शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्याचे अर्थचक्र थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक ...

रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. त्यामुळे या पंधरा दिवसांत जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा थांबणार आहे.

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या १३ हजारांच्या वर पोहोचली असून, मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या ४०० पेक्षा अधिक वाढली आहे. अजूनही काही दिवस ही संख्या वाढणार असल्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांनी कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी आवश्यक त्या नियमांचे पालन न केल्याने कोराेनाचा संसर्ग वाढला आहे. शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून बाधित होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता हा संसर्ग रोखण्यासाठीच राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सुमारे दहा महिने सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विविध उद्योग, बांधकामे, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, माॅल्स, आदी सर्व बंद होते. यामुळे या काळात या सर्व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. काही महिन्यांपूर्वीच सर्व व्यवहार नियमित होत असतानाच आता पुन्हा १५ एप्रिलपासून पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आर्थिक संकटाचा सामना करताना घायकुतीला आलेल्या या व्यावसायिकांना आता पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

त्यातच जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेरच पडू नये, यासाठी सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानेही यावेळी बंद राहणार आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे, तसेच शिमग्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाला पुन्हा लाॅकडाऊन करावे लागले. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे आर्थिक चक्र पंधरा दिवस थांबणार आहे.