शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

शोभना कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची पहिल्या लाटेत सुरू होताच साधारणत: एप्रिल २०२० पासून कोकण रेल्वे मार्गावरच्या ...

शोभना कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाची पहिल्या लाटेत सुरू होताच साधारणत: एप्रिल २०२० पासून कोकण रेल्वे मार्गावरच्या सर्वच गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर गणेशोत्सवाच्या कालावधीत गेल्या वर्षी ऑगस्टपासून काही गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा धोका सांगत दिवा-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या दोन पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या अजूनही बंद आहेत. मात्र, दामदुप्पट दर असलेल्या एक्स्प्रेस गाड्या भरमसाट सोडल्या आहेत. यातून कोरोना वाढत नाही का, अशी विचारणा सामान्य जनता करीत आहे.

दादर, दिवा पॅसेंजर रेल्वे दीड वर्षे बंदच

रत्नागिरीतून सुटणारी दादर (मुंबई) पॅसेंजर आणि दिवा-सावंतवाडी या कोकण मार्गावर धावणाऱ्या दोन

पॅसेजर गाड्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे, म्हणजे एप्रिलपासून आतापर्यंत बंद आहेत. या गाड्यांचे प्रवास भाडे १०० रुपयांच्या आत असल्याने सामान्यांना या गाडीतून मुंबई प्रवास परवडणारा आहे. मात्र, सध्या या दोन्ही गाड्या बंद राहिल्याने सामान्यांचा प्रवास थांबला आहे.

एक्स्प्रेसचे दर दामदुप्पट

काही महिन्यापूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या गणेशोत्सव जवळ आल्याने भक्तांसाठी सुमारे १२० एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु या गाड्या आरक्षित असून त्याचे भाडेही ३०० ते ३५० असून पॅसेंजरच्या तुलनेने कितीतरी पटीने अधिक आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावर कोकण कन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी, मंगला, तेजस आदींसह आता गणेशोत्सवासाठीच्या मिळून एकूण सुमारे १२० गाड्या धावत आहेत.

पॅसेंजर बंद; एक्स्प्रेस गाड्या धावतात सुसाट

सध्या कोकण रेल्वे मार्गावर पॅसेजर गाड्या जवळपास वर्षभर बंद असल्याने कोकणातील सामान्य नागरिकांना विशेष गाड्यांचा महागडा प्रवास करावा लागत आहे. सध्या पॅसेंजर बंद आणि एक्स्प्रेस सुसाट असे चित्र कोकण रेल्वे मार्गावर दिसत आहे. सामान्यांची पॅसेंजर गाडीची प्रतीक्षा कायम आहे.

रेल्वेचा ‘स्पेशल’ प्रवास परवडेना

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे या सामान्यांना तिकिटात दिलासा देणाऱ्या आहेत. रेल्वेचा प्रवास त्रासरहित आणि कमी पैशात करून देणारा असा आहे. आता सर्व निर्बंध उठले आहेत. मात्र, सामान्यांसाठी अजूनही पॅसेंजर साेडण्यात आलेली नाही. आणि स्पेशल गाड्यांचे भाडे परवडणारे नाही. गणेशोत्सवात तरी या गाड्या सोडाव्यात.

- श्रीधर साळवी, नागरिक, संगमेश्वर

रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांसाठी असलेली पॅसेंजर गाडी कित्येक महिन्यांपासून बंद ठेवली आहे. कोकण रेल्वे मार्गावर काही महिन्यांपासून स्पेशल गाड्या धावत आहेत, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका नाही का? मग पॅसेजर ही सामान्यांची गाडी बंद कशासाठी ठेवण्यात आली आहे. अजूनही ती सुरू करण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही.

- रवींद्र सावंत, रत्नागिरी

देशातील सर्वच पॅसेंजर बंद आहेत. गणेशोत्सव आता जवळ आला आहे. त्यामुळे गणेशभक्त या गाडीची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, पॅसेंजरबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय रेल्वे बोर्डाला आहे.

- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे, रत्नागिरी