शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कदम यांचा प्रवेश कोणाच्या पथ्यावर

By admin | Updated: July 15, 2014 00:15 IST

महत्त्वाची गणिते : आता चर्चा पुढील राजकारणाची

सुभाष कदम : चिपळूण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम याचा स्वगृही परतण्याचा निर्णय पक्का झाल्याने हा निर्णय नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे. कदम यांनी भास्कर जाधव यांना खुलेआम विरोध केला असल्याने सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासाठी कदम यांचे पुनरागमन बेरजेचे झाले आहे.राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झाल्यामुळे व अनेक तक्रारींची दखल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी न घेतल्यामुळे माजी आमदार कदम हे नाराज होते. जाधव आणि कदम यांचा हा वाद केवळ राजकीय नाही; तर तो व्यक्तिगत पातळीवरचा आहे. शिवशाहीचे सरकार आले असताना जाधव यांनी कदम यांच्या विविध चौकशा लावल्या होत्या. अनेक ठिकांनी दोघांनीही वैयक्तिक टोकाची टीका केली आहे. दुर्गेवाडी प्रकरण तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांचे विळ्या- भोपळ्याचे नाते जिल्ह्याला माहीत आहे. तरीही २००५ मध्ये कदम यांच्या शिफारशीमुळे जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश देण्यात आला.भास्कर जाधव प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषद सदस्य, राज्यमंत्री, संपर्कमंत्री व प्रदेशाध्यक्ष झाले. पक्षाने त्यांना सातत्याने संधी दिली. याकाळात त्यांनी कदम समर्थकांवर अन्याय केला. नगरपरिषद निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभे केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी केली. त्यांची तक्रार केली तर उलट राज्यमंत्रीपद गेल्यावर त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे कदम व त्यांचे समर्थक अधिक दुखावले. त्यांनी पक्षाचा त्याग केला व लोकसभा निवडणूक रायगडमधून लढवली. प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड झाली आणि कदम यांना पक्षात परतण्याची संधी प्राप्त झाली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कदम यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यावर उपाय सुचवले व कदम यांना पक्षात सक्रिय होण्याचे आमंत्रण मिळाले. या बदल्यात प्रदेश सरचिटणीसपद, रत्नागिरी जिल्ह्याची निवडणुकीची जबाबदारी व विधान परिषदेची आमदारकी कदमांच्या पदरात पडणार आहे. अर्थात शेखर निकम यांना निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी चिपळूण तालुक्यात कदम आणि भास्कर जाधव यांची ताकद समान आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचे कदम यांच्यावर सोपवले गेलेले काम सोपे नाही. त्यामुळे त्यांची कसोटी लागणार आहे.