शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बाळ मानेंचा पराभव कोणामुळे?

By admin | Updated: October 20, 2014 22:29 IST

जुन्या निवडणुकीची नवी चर्चा : शिवसेनेकडे एकगठ्ठा मते होती, मग ती जायची कुठे?

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल ९३ हजारांवर मते मिळवून राष्ट्रवादीतून सेनेत गेलेले उदय सामंत यांचा दणदणीत विजय झाला. याचाच अर्थ रत्नागिरी मतदारसंघात गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेची ताकद मोठी आहे, हे निर्विवाद सत्य समोर आले आहे. शिवसेनेच्या याच बळावर युतीतर्फे याआधी दोनवेळा निवडणूक लढवताना बाळ माने यांचा विजयच व्हायला हवा होता. परंतु तसे घडले नाही. याचाच अर्थ मित्रपक्षात विरोधकांना मदत करणारी वेगळी ‘राजकीय शाखा’ कार्यरत होती. त्यामुळेच माने यांचा २००४ व २००९मध्ये पराभव झाला, असा निष्कर्ष राजकीय जाणकारांमधून काढला जात आहे.गेल्या तीनही निवडणुकांत या दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी बोलकी आहे. २००४ मध्ये बाळ माने यांना युतीतर्फे लढल्यानंतर या मतदारसंघात ५७१८८ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले उदय सामंत यांना ६३,२३३ मते मिळून ते ६०४५ च्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माने यांना युतीतर्फे लढताना ६५९६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीतून लढणाऱ्या उदय सामंत यांना त्यावेळी ७४,२४५ मते मिळाली होती. ८२७६ मतांनी सामंत विजयी झाले होते. खरेतर बाळ माने हे अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यावेळी पराभूत झाले होते. त्या दोन्ही वेळी मित्रपक्षातीलच एका गटाने हाराकिरी केल्याचा आरोप भाजपाच्या गोटातूनही झाला होता. झाले गेले विसरून माने यांनी पुन्हा निवडणूक लढविली.दुसऱ्या वेळीही मित्रपक्षातील त्याच ‘शाखे’ने हाराकिरी केली. अन्यथा बाळ माने हे युतीचे (भाजपा) उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले असते, हाच निष्कर्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील सेनेच्या मतदान आकडेवरून स्पष्ट होत आहे.तीन महिन्यांपूर्वीच देशातील लोकसभा निवडणूक लढविली गेली. त्यावेळी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे कॉँग्रेस उमेदवार नीलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी पक्षातीलच हाराकिरी करणाऱ्या त्या ‘शाखे’च्या कार्यकर्त्यांवर राऊत यांनी चांगलाच औषधोपचार केला होता. त्यामुळेच राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ३१,५०० इतके मताधिक्य मिळाले होते. ज्या मतदारसंघात बाळ माने सेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून उभे असताना केवळ ६ ते ८ हजारांनी पराभूत व्हायचे, त्याच मतदारसंघात लोकसभेला असा काय चमत्कार घडला की, हा अनुशेष भरून काढून वर राऊतांना ३१,५०० एवढे मताधिक्य मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युती तुटली व मानेंचे ग्रह बिघडले. राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या सामंत यांच्यासमोर त्यांनी भाजपच्या बळावर निवडणूक लढविली. त्यावेळी सेनेची मदत त्यांना होणार नाही, हे स्पष्ट होते. परंतु प्रत्येक पक्षाची ताकद यावेळी समजणार होती. या आकडेवारीवरूनच मागील दोन्ही निवडणुकीत काय झाले, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसभेला भाजपाने पूर्ण साथ दिल्याने विधानसभेत भाजपला मानेंच्या विजयाचे ‘गिफ्ट’ मिळेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात युती तुटल्याने भाजप व सेनेची मते किती, हे कळले. सेनेच्या ९३ हजार मतांमध्ये राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या सामंत समर्थकांची मतेही आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांनाही यावेळी १४ हजारांवर मते मिळाली आहेत. यावेळी माने यांना ५४ हजारांवर मते मिळाली, ही भाजपाची मते मानली आणि शिवसेनेला मिळालेल्या ९३ हजारांमधील राष्ट्रवादीची ४० हजार मते वजा केली, तरी उर्वरित ५० हजार मते मागील दोन निवडणुकांमध्ये गेली कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. मित्रपक्षातील त्या शाखेच्या हाराकिरीतूनच मानेंचा २००४ व २००९मध्ये दोन्हीवेळा पराभव झाला, हे स्पष्ट आणि स्वच्छ असल्याचा निष्कर्ष निघत आहे. त्यामुळेच यावेळी सेनेला मिळालेल्या मतांमुळे याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकीतील निकालांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)एका शाखेची करामत ?सनबाळ मानेउदय सामंत२००४५७१८८६३२३३२००९ ६५९६९७४२४५२०१४५४५४९९३,८७६रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेची ताकद सिध्द.मित्रपक्षात विरोधकांना मदत करणारी वेगळी ‘राजकीय शाखा’ होती कार्यरत ?‘शाखे’च्या त्या कार्यकर्त्यांवर वेळीच उपचार केल्याने राऊत यांना मिळाले रत्नागिरीत मताधिक्य.