शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ७७३ विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : दरवर्षी नववीच्या वर्गातील संख्या व दहावीचे अर्ज भरणाऱ्या विद्यार्थीसंख्येत कमालीची तफावत आढळते. ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : दरवर्षी नववीच्या वर्गातील संख्या व दहावीचे अर्ज भरणाऱ्या विद्यार्थीसंख्येत कमालीची तफावत आढळते. जिल्ह्यात सातशे ते साडेसातशेच्या घरात संख्या आहे. यामध्ये काही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीअभावी शाळा सोडतात, तर काही विद्यार्थी पालकांची बदली होत असल्याने दुसऱ्या जिल्ह्यात, शहरात स्थलांतर करतात ही सुद्धा गळतीची कारणे आहेत.

शासन निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंत मुलांना पास करण्यात येते. नववीमध्ये मुले अप्रगत आढळली तर त्यांच्यासाठी शिक्षकांनी जादा अभ्यासवर्ग आयोजित करून मुलांची तयारी करून घेण्याच्या सूचना आहेत. दोन वर्षांपूर्वी नववीच्या मुलांना सरसकट पास न करता, त्यांच्यासाठी विशेष परिश्रम शिक्षक घेत असत. अप्रगत विद्यार्थ्यांनी शाळा सोडणे हेही कारण आहे. मात्र, २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने नववीपर्यंत सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्यात येत आहे.

जिल्ह्यात गळतीचे प्रमाण मर्यादितच

ग्रामीण भागात माध्यमिक शाळा असल्याने पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणे सोयीस्कर ठरत आहे. मात्र, गोरगरीब कुटुंबातील मुलांना नाइलाजास्तव शिक्षण थांबवून रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे.

पालकांच्या नोकरीतील बदलीमुळे एका गावातून दुसऱ्या गावात जावे लागते तेव्हा कुटुंबासह स्थलांतर करावे लागत असल्याने मुलांची शाळा आपसूकच बदलावी लागत आहे.

काही शाळा शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यासाठी अप्रगत मुलांना १७ नंबरचा फाॅर्म भरायला लावून बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश देतात. त्यामुळेही गळतीचे प्रमाण वाढत आहे.

आर्थिक चणचण, स्थलांतर

n जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण शून्य असल्याने शिक्षण थांबवून विवाह केले जात नाहीत.

n आर्थिक परिस्थितीमुळे काही मुलांना मध्येच शिक्षण थांबवावे लागत आहे.

n नोकरदार मंडळींना बदलीमुळे स्थलांतर करावे लागत असल्याने शाळा बदलावी लागते.

n अभ्यासात अप्रगत असणारी मुले दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा धसका घेऊन शाळा सोडतात.

नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गळती होत असली तरी आपल्या जिल्ह्यात हे प्रमाण अल्प आहे. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षक कठोर परिश्रम घेत असतात. गेल्या दोन वर्षांत तर सरसकट पास करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती व नोकरीतील बदली ही गळतीची दोन कारणे प्रमुख आहेत. काही विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत न जाता १७ नंबरचा फाॅर्म भरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देतात.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.