शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

प्रकल्प विराेधकांमध्ये एवढी मग्रुरी येथे कोठून : शशिकांत सुतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

राजापूर : तालुक्यात रिफायनरी प्रकल्प यावा, यासाठी बहुतांश राजापूर तालुका एकवटला असून, नाणार अथवा बारसू - सोलगाव येथील स्थानिकांसह ...

राजापूर : तालुक्यात रिफायनरी प्रकल्प यावा, यासाठी बहुतांश राजापूर तालुका एकवटला असून, नाणार अथवा बारसू - सोलगाव येथील स्थानिकांसह तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी आम्हाला प्रकल्प हवा असल्याची लेखी मागणी केली आहे. तरीही आम्ही प्रकल्पाची अथवा तालुक्याची बाजूच ऐकून घेणार नाही तर प्रकल्प गाडणार म्हणजे गाडणारच, अशी वक्तव्ये विरोधकांकडून केली जात आहेत, एवढी मग्रुरी येते कोठून, असा खरमरीत प्रश्न रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी केला आहे.

राजापूर व्यापारी संघासह तालुक्यातील सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या ५५ संघटना, राजापूर नगर परिषद व सर्वच राजकीय पक्षांनी बारसू - सोलगांवमध्ये प्रकल्प यावा, यासाठी ठराव केले आहेत. तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची तशी पत्रेच हाती येत आहेत. काही दिवसांपूर्वी रिफायनरी प्रकल्प समर्थक समित्यांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना ॲड. सुतार यांनी सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. सध्या प्रकल्पाला जो विरोध उभा केला जात आहे. यामध्ये समाविष्ट असलेली मंडळी पाहता यामध्ये एकतर एनजीओ किंवा मुंबईकर आहेत. मुंबईसारख्या प्रगत शहरात राहून गावाच्या विकासासाठी धडपडत असल्याचे दाखवण्याचे नवे फॅड निर्माण झाले आहे. त्यातून तालुक्याच्या विकासाचे मारेकरीही जनतेसमोर आले आहेत, ही बाब भविष्यात स्थानिकांनी नजरेसमोर ठेवून वाटचाल करण्यासाठी फायदेशीर ठरल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राजकीय पक्ष अनेक असले तरी आजपर्यंत राजापूर तालुका हा एकसंघ होता. सर्वच पक्ष व त्यातील पुढारी एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र दिसत होते. मात्र, आता अरेरावीची भाषा सुरू झाली असून, यामध्ये दिसणारे चेहरे कोणते आहेत, याचे तालुकावासीयांनी परीक्षण करण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्हा मंडळींकडे रिफायनरी समर्थनाचे शेकडो सकारात्मक मुद्दे आहेत, तर रिफायनरीसारख्या वैज्ञानिक प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी नारळ ठेवून शपथा घेण्याचे प्रकार घडत असल्याचे ऐकू येत आहे. त्यामुळे सुज्ञ तालुक्याच्या समाजव्यवस्थेत चिंता निर्माण झाली आहे.

प्रकल्प होणे न होणे दूरच, पण तालुक्याचा निर्णय आम्ही घेणार, अशी एका गोतावळ्याकडून लोकप्रतिनिधींना समांतर निर्णय व्यवस्था पुढे येऊ पाहात आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे मत ॲड. सुतार यांनी व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्प येऊन तालुक्याचे दारिद्र्य दूर व्हावे, यासाठी जनसमुदाय एकवटला असताना वैचारिक दारिद्र्यात खितपत पडलेल्यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जमीनमालकांनी संमती दिल्यानंतर नाणारपाठोपाठ शून्य विस्थापन असलेल्या बारसू - सोलगांमध्येही प्रकल्पाला विरोध असल्याचे चित्र उभे करण्याचा आटापिटा सुरू असल्याने या मंडळींचा विरोध शुध्द नसल्याचेही ॲड. शशिकांत सुतार यांनी सांगितले.