शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

जलशुध्दिकरण केंद्र कधी होणार ?

By admin | Updated: January 15, 2015 23:31 IST

पाजपंढरी ग्रामस्थांचा टाहो : पावसाळ्यात होणारी पायपीट थांबवावी

आंजर्ले : पावसाला सुरूवात झाल्यावर पाणीटंचाई दूर होते. मात्र, पाजपंढरी गावात पाणीटंचाई सुरू होते. बांधतिवरे नळपाणी योजनेत जलशुध्दिकरण केंद्र नसल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून ही योजना पावसाळ्यात बंद ठेवली जाते. यंदा तरी हे जलशुध्दिकरण केंद्र मंजूर करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.हर्णै - पाजपंढरी गावासाठी १९९६ साली बांधतिवरे नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. १९९६ला मंजूर झालेली ही योजना अनेकविध कारणानी रखडत राहिली. ही योजना २००८ साली पूर्ण झाली. या कालावधीत हर्णै-पाजपंढरीवासीयांना मार्च ते मे महिन्यात पाणी विकत घ्यावे लागत होते. ५० रूपये बॅरल या दराने या तीन महिन्यात लाखो रूपयांची पाणी विक्री व्हायची. २००८ साली बांधतिवरे नळपाणी योजना पूर्ण होऊन कार्यान्वीत झाल्यानंतर हर्णै व पाजपंढरीवासी आनंदी झाले. मात्र, त्यांचा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण नळपाणी योजना मंजूर करताना या योजनेत जलशुध्दिकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नव्हता. मुळात शुध्द पाणीपुरवठा होणे, हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बहुसंख्य आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. मात्र, ही योजना मंजूर करताना जलशुध्दिकरण केंद्राचा त्यात समावेश न केल्याने नागरिकांच्या आरोग्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही हेच सिध्द केले आहे. आता जलशुध्दिकरण केंद्राअभावी पावसाळ्यात ही योजना बंद ठेवावी लागते. कारण ही योजना ज्या नदीवर आहे, त्या नदीला दापोली शहरातून वाहणारी जोग नदी मिळते. दापोली शहरातील कचरा, सांडपाणी या जोग नदीतच टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात या नदीचे पाणी दूषित होते. टीसीएल पावडर टाकून १०० टक्के पाणी शुध्द करता येत नाही. पर्यायाने ही योजना बंद ठेवावी लागते. मासिक २०० रूपये पाणीपट्टी भरूनही भर पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद केला जातो.हर्णै व अडखळ गावाला पर्यायी नळपाणी योजना असल्याने या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही. मात्र, पावसाळ्यात धो-धो पाऊस कोसळणाऱ्या कोकणात पाजपंढरीवासीयांना विकतचे पाणी प्यावे लागते, तर काहींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हे उलटे चित्र राज्यातील एकमेव उदाहरण असावे. या स्थितीची दखल घेऊन शासनाने तातडीने बांधतिवरे नळपाणी योजनेसाठी जलशुध्दीकरण केेंद्र मंजूर करावे व पावसाळ्यात पाण्यासाठी होणारी पाजपंढरीवासीयांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)भर पावसातही सुरू राहते दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे तीव्र पाणी टंचाई.पाजपंढरी येथे भरपावसात निर्माण होणाऱ्या टंचाईवर कायमचा उपाय करण्याची मागणी.जलशुध्दिकरण केंद्र नसल्याने प्रदूषित पाण्याचा प्रश्न कायम ऐरणीवर.हर्णै - अडखळ गावाला पर्यायी नळपाणी योजना असल्याने पाणीटंचाई नाही.