शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बौध्दवाड्यांची तहान कधी भागणार ?

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील बौध्दवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळकनेक्शनचे ५०० प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते अपूर्ण आहेत. हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यासाठी खर्च करण्यात येणारे ४३ लाख रुपये निधी पडून राहणार आहे.पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे शासनाकडून असे धोरण राबवण्यात येत असताना, दुसरीकडे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून एखादा प्रस्ताव सादर करताना त्याची पूर्तता करुनच तो पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर पाठवणे आवश्यक आहे. मात्र, बौध्दवाड्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. या बौध्दवाड्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या कालावधीत पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नळ कनेक्शन देण्यासाठी सुमारे ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आलेले सुमारे ५०० प्रस्ताव अपूर्ण आहेत. नळजोडणीसाठी देण्यात आलेल्या अपूर्ण प्रस्तांवामध्ये कागदपत्रांची पूर्तता नाही. अपूर्ण कागदपत्र असताना ते प्रस्ताव कसे स्वीकारण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अपूर्ण प्रस्तावांमुळे नळकनेक्शन जोडणीसाठीचा निधी पडून राहणार आहे. त्यास नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)