शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बौध्दवाड्यांची तहान कधी भागणार ?

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील बौध्दवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळकनेक्शनचे ५०० प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते अपूर्ण आहेत. हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यासाठी खर्च करण्यात येणारे ४३ लाख रुपये निधी पडून राहणार आहे.पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे शासनाकडून असे धोरण राबवण्यात येत असताना, दुसरीकडे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून एखादा प्रस्ताव सादर करताना त्याची पूर्तता करुनच तो पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर पाठवणे आवश्यक आहे. मात्र, बौध्दवाड्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. या बौध्दवाड्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या कालावधीत पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नळ कनेक्शन देण्यासाठी सुमारे ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आलेले सुमारे ५०० प्रस्ताव अपूर्ण आहेत. नळजोडणीसाठी देण्यात आलेल्या अपूर्ण प्रस्तांवामध्ये कागदपत्रांची पूर्तता नाही. अपूर्ण कागदपत्र असताना ते प्रस्ताव कसे स्वीकारण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अपूर्ण प्रस्तावांमुळे नळकनेक्शन जोडणीसाठीचा निधी पडून राहणार आहे. त्यास नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)