शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

बौध्दवाड्यांची तहान कधी भागणार ?

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील बौध्दवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळकनेक्शनचे ५०० प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते अपूर्ण आहेत. हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यासाठी खर्च करण्यात येणारे ४३ लाख रुपये निधी पडून राहणार आहे.पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे शासनाकडून असे धोरण राबवण्यात येत असताना, दुसरीकडे त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून एखादा प्रस्ताव सादर करताना त्याची पूर्तता करुनच तो पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर पाठवणे आवश्यक आहे. मात्र, बौध्दवाड्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील बौध्दवाड्यांसाठी नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. या बौध्दवाड्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या कालावधीत पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नळ कनेक्शन देण्यासाठी सुमारे ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आलेले सुमारे ५०० प्रस्ताव अपूर्ण आहेत. नळजोडणीसाठी देण्यात आलेल्या अपूर्ण प्रस्तांवामध्ये कागदपत्रांची पूर्तता नाही. अपूर्ण कागदपत्र असताना ते प्रस्ताव कसे स्वीकारण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अपूर्ण प्रस्तावांमुळे नळकनेक्शन जोडणीसाठीचा निधी पडून राहणार आहे. त्यास नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)