शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्यात कोणती अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना थंबने पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यास संघटनेतर्फे मागणी करण्यात आली ...

रत्नागिरी : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना थंबने पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यास संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही तसेच अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. त्याकडे देखील शासनाने दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयीसुविधा उपलब्ध करण्यास शासनाला नेमकी कोणती अडचण आहे. रेशन दुकानदारांनी नेमके करायचे काय? असा संतप्त प्रश्न रत्नागिरी जिल्हा रेशनिंग दुकानदार केरोसिन मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित केला आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, रत्नागिरी जिल्हा कोरोनाचा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केलेला आहे. सर्व तालुक्यांतून ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये कोरोना रुग्ण आजही वाढत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी कंटेंनमेंट झोनदेखील केलेले आहेत. अशा परिस्थितीत जो ग्राहक कोरोना रुग्ण म्हणून घोषित केलेला असेल त्याला अन्न पुरवठा कायद्यान्वये धान्य देणे बंधनकारक असताना धान्य दुकानदाराकडून त्याचा अंगठा घेऊन त्याला धान्य वितरण केल्यास धान्य दुकानदार कोरोनाबाधित होईल व इतर ग्राहकांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे जिल्हा संघटनेने धान्य दुकानदारांच्या अंगठ्याद्वारे धान्य वाटप करण्याची मागणी केली होती. ती अद्याप मान्य न झाल्यामुळे निदान जिथे कंटेन्मेट झोन आहे किंवा कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना धान्य वाटप करण्यासाठी ऑफलाईन परवानगी मिळावी व ते वाटप नॉमिनीच्या अंगठ्याने अधिकृत करण्यात यावे, अशी मागणी यात केली आहे. जिल्ह्यामध्ये वितरण व्यवस्था हाताळताना धान्य दुकानदार कोरोनाबाधित होऊन अडचणीत आलेत. दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशाराही या निवेदनात दिला आहे.

संघटनेतर्फे रेशन दुकानदारांना विमा संरक्षण, मास्क, हॅण्ड सॅनिटायझर्स, हॅण्डग्लोज अशा विविध मागण्यांची मागणी करूनदेखील त्याची दखल शासनाकडून घेण्यात आलेली नाही. एकंदरीत शासनाला रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात शासनाला नेमकी कोणती अडचण आहे? असा संतप्त सवाल रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित केला आहे. याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे आवाहनही केले आहे.