शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सोळा वर्षात रत्नागिरीत काय कामे झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत ...

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली. रत्नागिरीत आता शिवसेनेची सामंतसेना झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून माने यांनी मंत्री सामंत यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी बाळ माने यांच्यावर कडाडून टीका केली. माने चारवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापाठी जनाधार नाही, असे विधान मंत्री सामंत यांनी केले होते. त्याला बाळ माने यांनी शुक्रवारी पुन्हा उत्तर दिले.

आपण चारवेळा पराभूत झालो आहोत. मात्र, सामंत यांनी आपण कसे निवडून आलो आहोत, याचा विचार करावा. ते कसे निवडून आले, याची माहिती आमदार राजन साळवी, प्रमोद शेरे अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आपण चार वेळा निवडून आलो, आपल्यामागे जनाधार नाही, असा आरोप करणारे सामंत आणि विनायक राऊत हे आपल्याला घेऊनच २०१९च्या निवडणुकीत फिरत होते, असा टोला त्यांनी हाणला.

चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी काय काम केले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोरोना येण्याआधीपासूनच असंख्य पदे रिक्त आहेत. ऑक्सिजन प्लांट करण्यासाठी वर्ष गेले. असंख्य सुविधा नाहीत. लसीकरणात कोणतेही नियोजन नाही, अशी टीका माने यांनी केली.

आपण विरोधी पक्षात आहोत. दोष दाखवून देणे हे आमचे काम आहे. मात्र, सामंत यांचे बगलबच्चे असे म्हणतात, की आम्ही सहन करणार नाही. हे कधी शिवसैनिक झाले. शिवसैनिकांशी आपली अजूनही चांगली मैत्री आहे. पण, आता रत्नागिरीत शिवसेना राहिलेलीच नाही. ती सामंत सेना झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.

आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या दोन पिढ्या एकाच ठिकाणी काम करत आहेत. आमच्या वडिलांनी आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण शिकवले आहे, असेही ते म्हणाले. आता आपल्याला राजकारण करायचे नाही. आपण कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आपल्यावर वैयक्तिक टीका झाली असली तरी आपण त्या पातळीवर उतरलेलो नाही. २०१४ ते २०१९ या काळात सामंत यांना मंत्रीपद का मिळाले नाही, २०१९ला मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री न करता सिंधुदुर्गचे का करण्यात आले, असे प्रश्न आपण विचारलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

सध्या रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. बलात्कारासारख्या खटल्यातील आरोपींना आता राजाश्रय मिळत आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी बाजीगर, सिंघम होणार

वाढलेली गुन्हेगारी पाहता रत्नागिरीत कोणी सिंघम किंवा बाजीगर येणे गरजेचे आहे. भाजपकडून मी तो सिंघम होणार आहे. बाजीगरही मीच आहे, असे त्यांनी सांगितले आणि जिथे जिथे अन्याय होईल, तिथे आपण सर्वात प्रथम पोहोचणार असल्याचेही ते म्हणाले.