शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सोळा वर्षात रत्नागिरीत काय कामे झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत ...

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली. रत्नागिरीत आता शिवसेनेची सामंतसेना झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून माने यांनी मंत्री सामंत यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी बाळ माने यांच्यावर कडाडून टीका केली. माने चारवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापाठी जनाधार नाही, असे विधान मंत्री सामंत यांनी केले होते. त्याला बाळ माने यांनी शुक्रवारी पुन्हा उत्तर दिले.

आपण चारवेळा पराभूत झालो आहोत. मात्र, सामंत यांनी आपण कसे निवडून आलो आहोत, याचा विचार करावा. ते कसे निवडून आले, याची माहिती आमदार राजन साळवी, प्रमोद शेरे अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आपण चार वेळा निवडून आलो, आपल्यामागे जनाधार नाही, असा आरोप करणारे सामंत आणि विनायक राऊत हे आपल्याला घेऊनच २०१९च्या निवडणुकीत फिरत होते, असा टोला त्यांनी हाणला.

चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी काय काम केले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोरोना येण्याआधीपासूनच असंख्य पदे रिक्त आहेत. ऑक्सिजन प्लांट करण्यासाठी वर्ष गेले. असंख्य सुविधा नाहीत. लसीकरणात कोणतेही नियोजन नाही, अशी टीका माने यांनी केली.

आपण विरोधी पक्षात आहोत. दोष दाखवून देणे हे आमचे काम आहे. मात्र, सामंत यांचे बगलबच्चे असे म्हणतात, की आम्ही सहन करणार नाही. हे कधी शिवसैनिक झाले. शिवसैनिकांशी आपली अजूनही चांगली मैत्री आहे. पण, आता रत्नागिरीत शिवसेना राहिलेलीच नाही. ती सामंत सेना झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.

आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या दोन पिढ्या एकाच ठिकाणी काम करत आहेत. आमच्या वडिलांनी आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण शिकवले आहे, असेही ते म्हणाले. आता आपल्याला राजकारण करायचे नाही. आपण कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आपल्यावर वैयक्तिक टीका झाली असली तरी आपण त्या पातळीवर उतरलेलो नाही. २०१४ ते २०१९ या काळात सामंत यांना मंत्रीपद का मिळाले नाही, २०१९ला मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री न करता सिंधुदुर्गचे का करण्यात आले, असे प्रश्न आपण विचारलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

सध्या रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. बलात्कारासारख्या खटल्यातील आरोपींना आता राजाश्रय मिळत आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी बाजीगर, सिंघम होणार

वाढलेली गुन्हेगारी पाहता रत्नागिरीत कोणी सिंघम किंवा बाजीगर येणे गरजेचे आहे. भाजपकडून मी तो सिंघम होणार आहे. बाजीगरही मीच आहे, असे त्यांनी सांगितले आणि जिथे जिथे अन्याय होईल, तिथे आपण सर्वात प्रथम पोहोचणार असल्याचेही ते म्हणाले.