शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोळा वर्षात रत्नागिरीत काय कामे झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत ...

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली. रत्नागिरीत आता शिवसेनेची सामंतसेना झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून माने यांनी मंत्री सामंत यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी बाळ माने यांच्यावर कडाडून टीका केली. माने चारवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापाठी जनाधार नाही, असे विधान मंत्री सामंत यांनी केले होते. त्याला बाळ माने यांनी शुक्रवारी पुन्हा उत्तर दिले.

आपण चारवेळा पराभूत झालो आहोत. मात्र, सामंत यांनी आपण कसे निवडून आलो आहोत, याचा विचार करावा. ते कसे निवडून आले, याची माहिती आमदार राजन साळवी, प्रमोद शेरे अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आपण चार वेळा निवडून आलो, आपल्यामागे जनाधार नाही, असा आरोप करणारे सामंत आणि विनायक राऊत हे आपल्याला घेऊनच २०१९च्या निवडणुकीत फिरत होते, असा टोला त्यांनी हाणला.

चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी काय काम केले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोरोना येण्याआधीपासूनच असंख्य पदे रिक्त आहेत. ऑक्सिजन प्लांट करण्यासाठी वर्ष गेले. असंख्य सुविधा नाहीत. लसीकरणात कोणतेही नियोजन नाही, अशी टीका माने यांनी केली.

आपण विरोधी पक्षात आहोत. दोष दाखवून देणे हे आमचे काम आहे. मात्र, सामंत यांचे बगलबच्चे असे म्हणतात, की आम्ही सहन करणार नाही. हे कधी शिवसैनिक झाले. शिवसैनिकांशी आपली अजूनही चांगली मैत्री आहे. पण, आता रत्नागिरीत शिवसेना राहिलेलीच नाही. ती सामंत सेना झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.

आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या दोन पिढ्या एकाच ठिकाणी काम करत आहेत. आमच्या वडिलांनी आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण शिकवले आहे, असेही ते म्हणाले. आता आपल्याला राजकारण करायचे नाही. आपण कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आपल्यावर वैयक्तिक टीका झाली असली तरी आपण त्या पातळीवर उतरलेलो नाही. २०१४ ते २०१९ या काळात सामंत यांना मंत्रीपद का मिळाले नाही, २०१९ला मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री न करता सिंधुदुर्गचे का करण्यात आले, असे प्रश्न आपण विचारलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

सध्या रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. बलात्कारासारख्या खटल्यातील आरोपींना आता राजाश्रय मिळत आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी बाजीगर, सिंघम होणार

वाढलेली गुन्हेगारी पाहता रत्नागिरीत कोणी सिंघम किंवा बाजीगर येणे गरजेचे आहे. भाजपकडून मी तो सिंघम होणार आहे. बाजीगरही मीच आहे, असे त्यांनी सांगितले आणि जिथे जिथे अन्याय होईल, तिथे आपण सर्वात प्रथम पोहोचणार असल्याचेही ते म्हणाले.