शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

सोळा वर्षात रत्नागिरीत काय कामे झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत ...

रत्नागिरी : गेल्या १६ वर्षात आरोग्याच्या दृष्टीने, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींबाबत रत्नागिरी तालुक्यात काय विकास झाला आहे, असा प्रश्न करत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या काही वर्षात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली. रत्नागिरीत आता शिवसेनेची सामंतसेना झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून माने यांनी मंत्री सामंत यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी बाळ माने यांच्यावर कडाडून टीका केली. माने चारवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापाठी जनाधार नाही, असे विधान मंत्री सामंत यांनी केले होते. त्याला बाळ माने यांनी शुक्रवारी पुन्हा उत्तर दिले.

आपण चारवेळा पराभूत झालो आहोत. मात्र, सामंत यांनी आपण कसे निवडून आलो आहोत, याचा विचार करावा. ते कसे निवडून आले, याची माहिती आमदार राजन साळवी, प्रमोद शेरे अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आपण चार वेळा निवडून आलो, आपल्यामागे जनाधार नाही, असा आरोप करणारे सामंत आणि विनायक राऊत हे आपल्याला घेऊनच २०१९च्या निवडणुकीत फिरत होते, असा टोला त्यांनी हाणला.

चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी काय काम केले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोरोना येण्याआधीपासूनच असंख्य पदे रिक्त आहेत. ऑक्सिजन प्लांट करण्यासाठी वर्ष गेले. असंख्य सुविधा नाहीत. लसीकरणात कोणतेही नियोजन नाही, अशी टीका माने यांनी केली.

आपण विरोधी पक्षात आहोत. दोष दाखवून देणे हे आमचे काम आहे. मात्र, सामंत यांचे बगलबच्चे असे म्हणतात, की आम्ही सहन करणार नाही. हे कधी शिवसैनिक झाले. शिवसैनिकांशी आपली अजूनही चांगली मैत्री आहे. पण, आता रत्नागिरीत शिवसेना राहिलेलीच नाही. ती सामंत सेना झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.

आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या दोन पिढ्या एकाच ठिकाणी काम करत आहेत. आमच्या वडिलांनी आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण शिकवले आहे, असेही ते म्हणाले. आता आपल्याला राजकारण करायचे नाही. आपण कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आपल्यावर वैयक्तिक टीका झाली असली तरी आपण त्या पातळीवर उतरलेलो नाही. २०१४ ते २०१९ या काळात सामंत यांना मंत्रीपद का मिळाले नाही, २०१९ला मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री न करता सिंधुदुर्गचे का करण्यात आले, असे प्रश्न आपण विचारलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

सध्या रत्नागिरीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. बलात्कारासारख्या खटल्यातील आरोपींना आता राजाश्रय मिळत आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी बाजीगर, सिंघम होणार

वाढलेली गुन्हेगारी पाहता रत्नागिरीत कोणी सिंघम किंवा बाजीगर येणे गरजेचे आहे. भाजपकडून मी तो सिंघम होणार आहे. बाजीगरही मीच आहे, असे त्यांनी सांगितले आणि जिथे जिथे अन्याय होईल, तिथे आपण सर्वात प्रथम पोहोचणार असल्याचेही ते म्हणाले.