शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

धरण नेमके कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी ...

मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी अपेक्षा त्यामागची असावी, असे त्यावेळी या धरणाच्या निर्मितीवरुन कळते. कारण धरणचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. यावरुन या धरणाला फार महत्त्व नसल्याचे समजते. यात फार विशेष काही नाही. कारण तालुक्यातील अन्य धरणांचे विशेषत: कोकणातील अनेक धरणांचे तसेच आहे. तालुक्यातील असलेल्या अन्य पाच धरणांचेही त्यांच्या निर्मितीपासून असेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांच्या निर्मितीपासून सेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांचा आजवर गावागावातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठीच उपयोग झाला. या धरणांवर कुठेही सिंचनाचे प्रकल्प अथवा ओलिताखाली शेतीची आकडेवारी वाढलेली नाही. धरण नसतानाही शेतकरी पावसावर अवलंबून असलेली शेती करत होता आणि धरणानंतरही पावसावरील शेतीच करत आला आहे. धरणामुळे तालुक्यात आजवर केव्हा दुबार शेती केल्याचे ऐकायला मिळत नाही. गत पाच वर्षांत गोळवली धरणाच्या पाण्यावर हिवाळ्यात कलिंगड आणि भाजीपाला लागवडीचा पर्याय काही शेतकरी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा याठिकाणी जशी धरणांना सुबत्ता आणली, तशी स्थिती कोकणात कुठेच पाहावयास मिळत नाही. तालुक्याचा विचार करता इथल्या लोकांना पाणी पिण्यास मिळणे ही मोठी अडचण होती आणि ती दूर करण्यासाठी तत्कालीन राजकारण्यांनी धरण निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि तेव्हापासून ते आजपर्चंत धरण निर्मितीमधील अर्थार्जन हा मोठा भाग असल्याने आगापीछा न पाहता म्हणजे त्याचा स्थानिक ग्रामस्थांना फायदा, तोटा न पाहता तालुक्यात सर्व धरणे उभारण्यात आली आहेत. राज्यातील अन्य भागातील विकसित झालेले सहकार क्षेत्र, सिंचन क्षेत्र पाहिल्यानंतर कोकणात कधी सहकार आणि पाणी मुरलेच नाही, असे दिसते. इथल्या सहकारी पतसंस्था आणि धरणांच्या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग किंवा त्यांची किंमत कळलेली नाही किंवा कळू दिलेली नाही. मात्र, कोकणात सहकार सिंचनातील गाळाचे राजकारण अधिकारी वर्गात चांगलेच मुरले आहे. त्यामुळेच उपयोगशून्य असलेल्या धरणांची एकामागून एक निर्मिती राहिली आहे आणि त्याची किंमत स्थानिकांना आता अनेक वर्षांनंतर मोजावी लागत आहे. तिवरे धरण असो वा अन्य स्थानिकांना त्याचा फार उपयोग झाला नाही. मात्र, त्यावेळी नुकसानच वेळेला जीवितहानी सहन करावी लागली आहे. यावरुन कोकणातील मंडणगड तालुक्यातील धरणे नक्की कुणासाठी आणि कशासाठी, याचा खरा फायदा का झाला आणि नुकसान कोणाचे होत आहे, हे पणदेरी धरणाच्या गळतीवरुन दिसून येत आहे. ही स्थिती आगामी काळात तरी बदलेल अशी अपेक्षा. सिंचन नाही तर जीव वाचवावा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

- प्रशांत सुर्वे, मंडणगड