शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

धरण नेमके कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी ...

मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी अपेक्षा त्यामागची असावी, असे त्यावेळी या धरणाच्या निर्मितीवरुन कळते. कारण धरणचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. यावरुन या धरणाला फार महत्त्व नसल्याचे समजते. यात फार विशेष काही नाही. कारण तालुक्यातील अन्य धरणांचे विशेषत: कोकणातील अनेक धरणांचे तसेच आहे. तालुक्यातील असलेल्या अन्य पाच धरणांचेही त्यांच्या निर्मितीपासून असेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांच्या निर्मितीपासून सेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांचा आजवर गावागावातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठीच उपयोग झाला. या धरणांवर कुठेही सिंचनाचे प्रकल्प अथवा ओलिताखाली शेतीची आकडेवारी वाढलेली नाही. धरण नसतानाही शेतकरी पावसावर अवलंबून असलेली शेती करत होता आणि धरणानंतरही पावसावरील शेतीच करत आला आहे. धरणामुळे तालुक्यात आजवर केव्हा दुबार शेती केल्याचे ऐकायला मिळत नाही. गत पाच वर्षांत गोळवली धरणाच्या पाण्यावर हिवाळ्यात कलिंगड आणि भाजीपाला लागवडीचा पर्याय काही शेतकरी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा याठिकाणी जशी धरणांना सुबत्ता आणली, तशी स्थिती कोकणात कुठेच पाहावयास मिळत नाही. तालुक्याचा विचार करता इथल्या लोकांना पाणी पिण्यास मिळणे ही मोठी अडचण होती आणि ती दूर करण्यासाठी तत्कालीन राजकारण्यांनी धरण निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि तेव्हापासून ते आजपर्चंत धरण निर्मितीमधील अर्थार्जन हा मोठा भाग असल्याने आगापीछा न पाहता म्हणजे त्याचा स्थानिक ग्रामस्थांना फायदा, तोटा न पाहता तालुक्यात सर्व धरणे उभारण्यात आली आहेत. राज्यातील अन्य भागातील विकसित झालेले सहकार क्षेत्र, सिंचन क्षेत्र पाहिल्यानंतर कोकणात कधी सहकार आणि पाणी मुरलेच नाही, असे दिसते. इथल्या सहकारी पतसंस्था आणि धरणांच्या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग किंवा त्यांची किंमत कळलेली नाही किंवा कळू दिलेली नाही. मात्र, कोकणात सहकार सिंचनातील गाळाचे राजकारण अधिकारी वर्गात चांगलेच मुरले आहे. त्यामुळेच उपयोगशून्य असलेल्या धरणांची एकामागून एक निर्मिती राहिली आहे आणि त्याची किंमत स्थानिकांना आता अनेक वर्षांनंतर मोजावी लागत आहे. तिवरे धरण असो वा अन्य स्थानिकांना त्याचा फार उपयोग झाला नाही. मात्र, त्यावेळी नुकसानच वेळेला जीवितहानी सहन करावी लागली आहे. यावरुन कोकणातील मंडणगड तालुक्यातील धरणे नक्की कुणासाठी आणि कशासाठी, याचा खरा फायदा का झाला आणि नुकसान कोणाचे होत आहे, हे पणदेरी धरणाच्या गळतीवरुन दिसून येत आहे. ही स्थिती आगामी काळात तरी बदलेल अशी अपेक्षा. सिंचन नाही तर जीव वाचवावा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

- प्रशांत सुर्वे, मंडणगड