शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

धरण नेमके कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी ...

मंडणगड शहरापासून वाहत जाणारे पाणी पणदेरी येथे सावित्री खाडीला मिळते. त्यामुळे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवावे, अशी अपेक्षा त्यामागची असावी, असे त्यावेळी या धरणाच्या निर्मितीवरुन कळते. कारण धरणचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. यावरुन या धरणाला फार महत्त्व नसल्याचे समजते. यात फार विशेष काही नाही. कारण तालुक्यातील अन्य धरणांचे विशेषत: कोकणातील अनेक धरणांचे तसेच आहे. तालुक्यातील असलेल्या अन्य पाच धरणांचेही त्यांच्या निर्मितीपासून असेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांच्या निर्मितीपासून सेच अपुरे, अर्धवट काम आहे. त्यांचा आजवर गावागावातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठीच उपयोग झाला. या धरणांवर कुठेही सिंचनाचे प्रकल्प अथवा ओलिताखाली शेतीची आकडेवारी वाढलेली नाही. धरण नसतानाही शेतकरी पावसावर अवलंबून असलेली शेती करत होता आणि धरणानंतरही पावसावरील शेतीच करत आला आहे. धरणामुळे तालुक्यात आजवर केव्हा दुबार शेती केल्याचे ऐकायला मिळत नाही. गत पाच वर्षांत गोळवली धरणाच्या पाण्यावर हिवाळ्यात कलिंगड आणि भाजीपाला लागवडीचा पर्याय काही शेतकरी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा याठिकाणी जशी धरणांना सुबत्ता आणली, तशी स्थिती कोकणात कुठेच पाहावयास मिळत नाही. तालुक्याचा विचार करता इथल्या लोकांना पाणी पिण्यास मिळणे ही मोठी अडचण होती आणि ती दूर करण्यासाठी तत्कालीन राजकारण्यांनी धरण निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि तेव्हापासून ते आजपर्चंत धरण निर्मितीमधील अर्थार्जन हा मोठा भाग असल्याने आगापीछा न पाहता म्हणजे त्याचा स्थानिक ग्रामस्थांना फायदा, तोटा न पाहता तालुक्यात सर्व धरणे उभारण्यात आली आहेत. राज्यातील अन्य भागातील विकसित झालेले सहकार क्षेत्र, सिंचन क्षेत्र पाहिल्यानंतर कोकणात कधी सहकार आणि पाणी मुरलेच नाही, असे दिसते. इथल्या सहकारी पतसंस्था आणि धरणांच्या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग किंवा त्यांची किंमत कळलेली नाही किंवा कळू दिलेली नाही. मात्र, कोकणात सहकार सिंचनातील गाळाचे राजकारण अधिकारी वर्गात चांगलेच मुरले आहे. त्यामुळेच उपयोगशून्य असलेल्या धरणांची एकामागून एक निर्मिती राहिली आहे आणि त्याची किंमत स्थानिकांना आता अनेक वर्षांनंतर मोजावी लागत आहे. तिवरे धरण असो वा अन्य स्थानिकांना त्याचा फार उपयोग झाला नाही. मात्र, त्यावेळी नुकसानच वेळेला जीवितहानी सहन करावी लागली आहे. यावरुन कोकणातील मंडणगड तालुक्यातील धरणे नक्की कुणासाठी आणि कशासाठी, याचा खरा फायदा का झाला आणि नुकसान कोणाचे होत आहे, हे पणदेरी धरणाच्या गळतीवरुन दिसून येत आहे. ही स्थिती आगामी काळात तरी बदलेल अशी अपेक्षा. सिंचन नाही तर जीव वाचवावा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

- प्रशांत सुर्वे, मंडणगड