शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

कंपन्यांना परवाने देताना सुरक्षिततेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत एकामागोमाग एक स्फाेट होण्याचे प्रकार सुरू असून, ही मालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत एकामागोमाग एक स्फाेट होण्याचे प्रकार सुरू असून, ही मालिका आणखी किती जणांचे बळी घेऊन थांबणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंपन्यांना उत्पादनाचे परवाने देताना खरोखरच सुरक्षिततेची पाहणी होते का? हा प्रश्न निरुत्तरित राहिला आहे.

मागील चार महिन्यात लोटे औद्योगिक वसाहतीत जवळपास सात अपघात घडले. एका वायुगळतीचा प्रकार वगळता सहा अपघात हे स्फोट व आग लागून झाले आहेत. प्रथम येथील दुर्गा केमिकल ही कंपनी जानेवारी महिन्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्मसात झाली. यावेळीही कंपनीत एकापाठोपाठ एक स्फोट होत असताना कामगारांसह नागरिकांसमोर मृत्यूच उभा राहिला होता. त्यानंतर येथील लासा सुपर जेनेरिक कंपनीच्या डेरापेंट या युनीटमधील घनकचऱ्याला आग लागली. श्री पुष्कर कंपनीत वायुगळतीची घटना घडून जवळच असणारी लोटेतील नागरी वस्ती गुदमरून गेली. पाठोपाठ १५ मार्चला येथील सुप्रिया कंपनीत आग लागून दोन कामगार भाजले गेले तर २० मार्च रोजी घरडा केमिकलमध्ये स्फोट होऊन आग लागली. यात पाच कामगारांचा बळी गेला. या घटनेला महिना होतो ना होतो तोच १८ एप्रिल रोजी समर्थ इंजिनीअरिंग या कंपनीत स्फोट होऊन तिघांचा जागीच मृत्यू तर दोघांनी उपचार घेताना प्राण सोडला. या अपघाताच्या दहाव्या दिवशी म्हणजे दि.२८ रोजी येथील एमआर स्पेशालिटी केमिकल कंपनीत स्फोट होऊन आग लागली.

यातील घरडा व सुप्रिया केमिकल कंपनीत स्वत:ची आगप्रतिरोधक सुरक्षा यंत्रणा असल्याने परिसरातील रहिवाशांपर्यंत याची तीव्रता जाणवली नाही. मात्र यातील लासा सुपरजेनेरिक, श्री पुष्कर केमिकल, दुर्गा केमिकल, समर्थ इंजिनीअरिंग व एमआर स्पेशालिटी याचा विचार संपूर्णपणे बाहेरील अग्निशमन यंत्रणांवरच अवलंबून राहावे लागले. मात्र या आगींवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलांना अग्निपरीक्षेलाच सामोरे जाण्याची परिस्थिती दिसली. समर्थ इंजिनीअरिंगमध्ये प्रत्यक्ष आगीच्या मुळाशी जाण्यास कंपनीत अस्ताव्यस्त पडलेले रासायनिक ड्रम अडथळा ठरल्याने तेथे अडकलेल्या कामगारांचे जीव वाचवण्यात अपयश आले. असेच चित्र एमआर कंपनीत दिसले. कंपनीच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण प्लांटभोवती रासायनिक ड्रमांचा खच पडला होता. यामुळे अग्निशमन दलाचे वाहन कंपनीबाहेर रस्त्यावर उभे करून अग्निशमन दलाचे कर्मचारी नियंत्रण मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. त्यामुळे या कंपन्यांना उत्पादनात परवानगी देताना शासनाचे सुरक्षा विभाग नेमकी कशाची पाहणी करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही परवानगी केवळ कागदोपत्रीच दिल्या जातात का, असाही प्रश्न आहे. कारण एमआर कंपनीत उभारण्यात आलेली आगप्रतिबंधक यंत्रणा मृतावस्थेत होती. मग अशा कंपन्यांना परवाना मिळताेच कसा? असा प्रश्न विचारला जात आहे.