शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांना परवाने देताना सुरक्षिततेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत एकामागोमाग एक स्फाेट होण्याचे प्रकार सुरू असून, ही मालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत एकामागोमाग एक स्फाेट होण्याचे प्रकार सुरू असून, ही मालिका आणखी किती जणांचे बळी घेऊन थांबणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंपन्यांना उत्पादनाचे परवाने देताना खरोखरच सुरक्षिततेची पाहणी होते का? हा प्रश्न निरुत्तरित राहिला आहे.

मागील चार महिन्यात लोटे औद्योगिक वसाहतीत जवळपास सात अपघात घडले. एका वायुगळतीचा प्रकार वगळता सहा अपघात हे स्फोट व आग लागून झाले आहेत. प्रथम येथील दुर्गा केमिकल ही कंपनी जानेवारी महिन्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्मसात झाली. यावेळीही कंपनीत एकापाठोपाठ एक स्फोट होत असताना कामगारांसह नागरिकांसमोर मृत्यूच उभा राहिला होता. त्यानंतर येथील लासा सुपर जेनेरिक कंपनीच्या डेरापेंट या युनीटमधील घनकचऱ्याला आग लागली. श्री पुष्कर कंपनीत वायुगळतीची घटना घडून जवळच असणारी लोटेतील नागरी वस्ती गुदमरून गेली. पाठोपाठ १५ मार्चला येथील सुप्रिया कंपनीत आग लागून दोन कामगार भाजले गेले तर २० मार्च रोजी घरडा केमिकलमध्ये स्फोट होऊन आग लागली. यात पाच कामगारांचा बळी गेला. या घटनेला महिना होतो ना होतो तोच १८ एप्रिल रोजी समर्थ इंजिनीअरिंग या कंपनीत स्फोट होऊन तिघांचा जागीच मृत्यू तर दोघांनी उपचार घेताना प्राण सोडला. या अपघाताच्या दहाव्या दिवशी म्हणजे दि.२८ रोजी येथील एमआर स्पेशालिटी केमिकल कंपनीत स्फोट होऊन आग लागली.

यातील घरडा व सुप्रिया केमिकल कंपनीत स्वत:ची आगप्रतिरोधक सुरक्षा यंत्रणा असल्याने परिसरातील रहिवाशांपर्यंत याची तीव्रता जाणवली नाही. मात्र यातील लासा सुपरजेनेरिक, श्री पुष्कर केमिकल, दुर्गा केमिकल, समर्थ इंजिनीअरिंग व एमआर स्पेशालिटी याचा विचार संपूर्णपणे बाहेरील अग्निशमन यंत्रणांवरच अवलंबून राहावे लागले. मात्र या आगींवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलांना अग्निपरीक्षेलाच सामोरे जाण्याची परिस्थिती दिसली. समर्थ इंजिनीअरिंगमध्ये प्रत्यक्ष आगीच्या मुळाशी जाण्यास कंपनीत अस्ताव्यस्त पडलेले रासायनिक ड्रम अडथळा ठरल्याने तेथे अडकलेल्या कामगारांचे जीव वाचवण्यात अपयश आले. असेच चित्र एमआर कंपनीत दिसले. कंपनीच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण प्लांटभोवती रासायनिक ड्रमांचा खच पडला होता. यामुळे अग्निशमन दलाचे वाहन कंपनीबाहेर रस्त्यावर उभे करून अग्निशमन दलाचे कर्मचारी नियंत्रण मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. त्यामुळे या कंपन्यांना उत्पादनात परवानगी देताना शासनाचे सुरक्षा विभाग नेमकी कशाची पाहणी करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही परवानगी केवळ कागदोपत्रीच दिल्या जातात का, असाही प्रश्न आहे. कारण एमआर कंपनीत उभारण्यात आलेली आगप्रतिबंधक यंत्रणा मृतावस्थेत होती. मग अशा कंपन्यांना परवाना मिळताेच कसा? असा प्रश्न विचारला जात आहे.