शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दरवाढीने केले श्रावणाचे स्वागत

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

टॉमेटोचे दर हाताबाहेर : शाकाहार पाळण्याचा ‘धर्म’ खिशाला चाट देणार

रत्नागिरी : श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांचे दर वधारले आहेत. ६० ते १२० रूपये किलो दराने भाज्यांची विक्री होत असल्याने यंदा श्रावणात शाकाहार पाळणे म्हणजे खिशाला चाट देणारे ठरणार आहे.श्रावण महिना व्रतवैकल्याचा असून, हिंदू भाविक महिनाभर शाकाहार अवलंबतात. बहुतांश मंडळी उपवास करीत असतात. परंतु भाज्यांचे दर वधारल्यामुळे चार ते सहा माणसांच्या कुटुंबात भाज्या काय पुरविणार, असा प्रश्न गृहिणींना पडू लागला आहे. दररोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या टोमॅटोच्या दराने चांगलीच उचल खाल्ली आहे. ८० ते १०० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. शिवाय टोमॅटोची प्रतही चांगली नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत.आल्याच्या दरानेही मात्र उच्चांक गाठला आहे. १५० ते २०० रूपये किलो दराने आल्याची विक्री सुरू आहे. त्यामुळे जेवणात हिरवा मसाला वापरण्यापूर्वीच ठसका लागण्याची वेळ आली आहे. मिरची ८० ते १०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. एरव्ही पाच रूपयांना मिळणारी पुदीनाची जुडी ३० रूपये दराने विकण्यात येत आहे. किरकोळ विक्रेत्यांकडील पुदीना गायब झाला आहे. लसूणसुध्दा ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.सर्वसामान्यांना परवडणारी वांगी ३० ते ४० रूपयांच्या घरात आहेत. दूधी ३० रूपये, कोबी ४० रूपये, तर फ्लॉवर ५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. सर्व भाज्यांचे दर २५ ते ३० रूपयांच्या घरात स्थिर होते. मात्र, आता तेही वधारले आहेत. गेल्या आठवड्यात फरसबी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत होती. मात्र, त्यामध्ये घसरण झाली असून, ६० रूपये दराने विकण्यात येत आहे. सिमला मिरची, घेवडा, पावटा ६० रूपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे. दोडकी, भेंडी, गाजर ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. पावकिलो भाज्यांसाठी २० ते २५ रूपये मोजावे लागत आहेत. बाजारात रानभाज्यांबरोबर गावठी पालेभाज्यांही उपलब्ध आहेत. माठ, मेथी, पालक, मूळा, शेपू आदी भाज्यांच्या जुड्या १० ते १५ रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहेत.कांदा २५ ते ३० रूपये किलो, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. काकडी, बीट ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान संपत आला असून, ईद तोंडावर आली आहे. ईदसाठी हिरवा मसाला, टोमॅटो कांदा, बटाटा, काकडी, गाजर, बीट, लिंबूला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, दरामुळे ग्राहक हैराण होत आहेत.(प्रतिनिधी)