शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लांजातील आठवडा बाजार प्रशासनाने पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

लांजा शहरात मंगळवारी भरणारा आठवडा बाजार दुपारी नगर परिषद प्रशासनाने बंद केला. (छाया : अनिल कासारे) लांजा : तालुक्याच्या ...

लांजा शहरात मंगळवारी भरणारा आठवडा बाजार दुपारी नगर परिषद प्रशासनाने बंद केला. (छाया : अनिल कासारे)

लांजा : तालुक्याच्या ठिकाणी शहरात आठवडा बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाल्याने प्रशासनाने हस्तक्षेप करत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने दुपारी २ वाजता बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही माघारी फिरावे लागले.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने सोमवारी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे व लांजा तालुका व्यापारी संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे सांगितले. तसेच नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोमवारी रात्री ८ वाजता लांजा प्रांताधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मंगळवारी शहरात होणारा आठवडा बाजार हा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाजार सुरू ठेवण्याचा अचानक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बाजाराला कोल्हापूर येथून येणारे व्यापारी तोपर्यंत शहरामध्ये दाखल झाले होते. मंगळवारचा शहरातील आठवडा बाजार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाजारात उसळलेली गर्दी पाहता, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी बाजारात येऊन दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार राजन साळवीही उपस्थित होते.

चाैकट

बाजार भरायलाच का दिला

आठवडा बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी लावलेली दुकाने आणि कमी अवधीत बंद करताना त्यांची धावपळ उडाली होती. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली. जर तुम्हाला बाजारपेठ दुपारी २ वाजता बंद करायची होती, तर बाजार भरायला द्यायचा नव्हता, असा सूरही व्यापाऱ्यांनी यावेळी आळवला. कोल्हापूर येथून आलेल्या व्यापाऱ्यांना दुपारीच आपली दुकाने बंद करून माघारी परतावे लागले.