शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

लांजातील आठवडा बाजार प्रशासनाने पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

लांजा शहरात मंगळवारी भरणारा आठवडा बाजार दुपारी नगर परिषद प्रशासनाने बंद केला. (छाया : अनिल कासारे) लांजा : तालुक्याच्या ...

लांजा शहरात मंगळवारी भरणारा आठवडा बाजार दुपारी नगर परिषद प्रशासनाने बंद केला. (छाया : अनिल कासारे)

लांजा : तालुक्याच्या ठिकाणी शहरात आठवडा बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाल्याने प्रशासनाने हस्तक्षेप करत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने दुपारी २ वाजता बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही माघारी फिरावे लागले.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने सोमवारी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे व लांजा तालुका व्यापारी संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे सांगितले. तसेच नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोमवारी रात्री ८ वाजता लांजा प्रांताधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मंगळवारी शहरात होणारा आठवडा बाजार हा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाजार सुरू ठेवण्याचा अचानक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बाजाराला कोल्हापूर येथून येणारे व्यापारी तोपर्यंत शहरामध्ये दाखल झाले होते. मंगळवारचा शहरातील आठवडा बाजार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाजारात उसळलेली गर्दी पाहता, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी बाजारात येऊन दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार राजन साळवीही उपस्थित होते.

चाैकट

बाजार भरायलाच का दिला

आठवडा बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी लावलेली दुकाने आणि कमी अवधीत बंद करताना त्यांची धावपळ उडाली होती. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली. जर तुम्हाला बाजारपेठ दुपारी २ वाजता बंद करायची होती, तर बाजार भरायला द्यायचा नव्हता, असा सूरही व्यापाऱ्यांनी यावेळी आळवला. कोल्हापूर येथून आलेल्या व्यापाऱ्यांना दुपारीच आपली दुकाने बंद करून माघारी परतावे लागले.