शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वातावरण पावसाळी, पण पाऊस कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर घेतला, असे वाटू लागले आहे. मात्र, रात्री जाेरदार पडलेल्या पावसानंतर ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर घेतला, असे वाटू लागले आहे. मात्र, रात्री जाेरदार पडलेल्या पावसानंतर शुक्रवारी दिवसभर वातावरण पावसाळी वाटत असले, तरी त्यातुलनेने पाऊस कमीच आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात १ जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर घेतला हाेता. तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामाने जिल्ह्यात चांगलीच सुरुवात केली होती. त्यामुळे या काळात सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. परिणामी शेतीची कामेही मार्गी लागली आहेत. त्यानंतर दिवसभर ऊन आणि रात्रभर मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसाचा हा जोर कायम राहील, असे वाटत होते. परंतु गेल्या दोन - तीन दिवसांपासून पाऊस अतिशय कमी झाला आहे. दिवसातून किरकोळ येणारी सर वगळता कडक उन्हाला सुरुवात झाल्याने उकाडाही वाढला होता.

पुन्हा बुधवारपासून पावसाने रात्री हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत हाेता. शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पुन्हा तो कमी झाला. दिवसभर पावसाचे वातावरण कायम होते; मात्र पाऊस तुरळक पडत होता. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाश मेघांनी अच्छादून आल्याने पाऊस जोरदार सुरू होण्याची शक्यता वाटत होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ३५२.९० मिलिमीटर (सरासरी ३९.२१ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाने जिल्ह्यात कुठेही नोंद झाल्याची घटना नाही.

शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्यासुमारास भोस्ते घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परंतु बांधकाम विभागाने ती दूर केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे.