शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

वातावरण पावसाळी, पण पाऊस कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर घेतला, असे वाटू लागले आहे. मात्र, रात्री जाेरदार पडलेल्या पावसानंतर ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर घेतला, असे वाटू लागले आहे. मात्र, रात्री जाेरदार पडलेल्या पावसानंतर शुक्रवारी दिवसभर वातावरण पावसाळी वाटत असले, तरी त्यातुलनेने पाऊस कमीच आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात १ जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर घेतला हाेता. तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामाने जिल्ह्यात चांगलीच सुरुवात केली होती. त्यामुळे या काळात सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. परिणामी शेतीची कामेही मार्गी लागली आहेत. त्यानंतर दिवसभर ऊन आणि रात्रभर मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसाचा हा जोर कायम राहील, असे वाटत होते. परंतु गेल्या दोन - तीन दिवसांपासून पाऊस अतिशय कमी झाला आहे. दिवसातून किरकोळ येणारी सर वगळता कडक उन्हाला सुरुवात झाल्याने उकाडाही वाढला होता.

पुन्हा बुधवारपासून पावसाने रात्री हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत हाेता. शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पुन्हा तो कमी झाला. दिवसभर पावसाचे वातावरण कायम होते; मात्र पाऊस तुरळक पडत होता. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाश मेघांनी अच्छादून आल्याने पाऊस जोरदार सुरू होण्याची शक्यता वाटत होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ३५२.९० मिलिमीटर (सरासरी ३९.२१ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाने जिल्ह्यात कुठेही नोंद झाल्याची घटना नाही.

शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्यासुमारास भोस्ते घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परंतु बांधकाम विभागाने ती दूर केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे.