शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: सियालकोटच्या लुनी इथला दहशतवादी तळ भारताने केला उद्ध्वस्त
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
5
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
6
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
7
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
8
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
9
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
10
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
11
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
12
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
13
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
14
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
15
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
16
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
17
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
18
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
19
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
20
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी

हम होंगे कामयाब... मन में है विश्‍वास. . !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : ‘हम होंगे कामयाब... मन में है विश्‍वास.. पुरा है विश्‍वास..!’ असा आत्मविश्वासपूर्ण आवाज रायपाटणच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : ‘हम होंगे कामयाब... मन में है विश्‍वास.. पुरा है विश्‍वास..!’ असा आत्मविश्वासपूर्ण आवाज रायपाटणच्या कोविड केअर सेंटरमध्ये घुमला. रुग्ण, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या या एकत्रित आवाजाने उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांत निश्‍चितच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असणार. निमित्त होते रत्नागिरीचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांच्या समुपदेशनाचे.

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे काही डॉक्टर्स देव म्हणून जनतेनेच स्वीकारलेले असतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पेवेकर यांच्या बाबतीतील असाच अनुभव रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांनी अनुभवला. या रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वेच्छेने डॉ. पेवेकर रत्नागिरीतून तेथे पोहोचले होते.

रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मानसिक समस्या जाणून घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या ताणतणावाचे नियोजन कसे करावे, सकारात्मकता कशी वाढवावी, याबद्दल डॉ. पेवेकर यांनी दीर्घकाळ समुपदेशन केले.

तणावमुक्‍ती कशी साधावी यांचे विश्लेषणही डाॅ. पेवेकर यांनी केले.

बऱ्याचदा आपण नकारात्मक विचार करीत असतो. त्याचा तसाच परिणाम आपल्या दृष्टिकोनातून व शारीरिक किंवा मानसिक व्याधीतून दिसून येतो. म्हणूनच सकारात्मक, सद्सद्‌विवेक विचार ‘सेल्फ ऑफर्मेशन’ या तंत्राने कसे करायचे हे डॉ. पेवेकर यांनी प्रत्यक्ष दाखविले व सगळ्यांकडून करवून घेतले.

कोविड रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, फ्रंटलाईन वर्कर्स, कोविड पश्‍चात व्यक्‍ती यांना मानसिक आधार, समुपदेशन करण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील मानसिक आरोग्य व्यावसायिक एकत्र येऊन ‘सुकून’ हा प्रकल्प जिल्हाभर राबविणार आहेत. डॉ. कृष्णा पेवेकर यांचे मार्गदर्शन हा सुद्धा याचाच एक भाग होता. या उपक्रमाला तहसीलदार प्रतिभा वराळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे, रायपाटणचे वैद्यकीय अधिकारी, तलाठी गुरव, मंडल अधिकारी राईन यांचे यासाठी सहकार्य लाभले.

----------------------

रुग्णांना मानसिक आधार

कोविडच्या दुसऱ्या लाटेची गंभीरता व भयानकता आपण सारे जवळून पाहत आहोत. कोरोनाने आता अनेकांचे आप्त, कुटुंबीय, नातेवाइकांचे बळी घेण्याच्या दुःखद घटना घडत आहेत. त्यात प्रत्यक्ष रुग्णांच्या यातना तीव्र आढळतात. एकंदरीत सगळाच दृष्टिकोन नकारात्मक होऊन जातो. त्याचे पडसाद हे प्रतिकार शक्‍ती, बरी होण्याची प्रक्रिया, आजारापश्‍चात उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांमध्ये दिसून येतात. तणाव, चिंता, भीती का उद्‌भवतात, मेंदू व मेंदूतील रसायनांचा त्यांच्याशी काय संबंध असतो हे डॉ. पेवेकर यांनी समजावून सांगितले.