शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: April 24, 2016 00:40 IST

कमी पावसाचे दुष्परिणाम : टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या ६० वर; पाण्यासाठी वणवण सुरू

रत्नागिरी : कमी पाऊस पडल्याचे दुष्परिणाम ऐन उन्हाळ्यात जाणवत असून, आज जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील ३४ गावांमधील ६० वाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आजची पाणीटंचाई गतवर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळा सुरु असला तरी गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षीचा उन्हाळा कडक असल्याचे जाणवत आहे. विहिरी, नाले, तलाव, आदी पाण्याचे स्रोत आटत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे असल्याने भयंकर उकाडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याचे बाष्पीभवन जलदगतीने होत असून, जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया झपाट्याने होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील २२ गावांमधील ३६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती़ या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ३ खासगी टँकर्स अशा एकूण ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये आता १२ गावांमधील २४ वाड्यांची भर पडली आहे़ या टंचाईग्रस्तांना शासकीय ८ आणि खासगी २ अशा एकूण १० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाकडून टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे़ मात्र, प्रत्यक्षात त्यांना दोन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ यामुळे टंचाईग्रस्तांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़ दिवसेंदिवस या पाणीटंचाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)दापोलीत १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा!दापोली : दापोलीतील पंधरा गावांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने येथून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली असून, देवाचा डोंगर येथे मात्र मार्च महिण्यापासूनच टँकर धावू लागला आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. तसेच उन्हाचा कडाका देखील दिवसेंदिवस वाढत चालला असून, दापोलीतील काही गावांमधील पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मार्च महिन्यापासूनच जामगे देवाचा डोंगर व मंडणगड मधील भोलवली देवाचा डोंगर येथे पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. परंतु, उन्हाचा कडाका पाहता भविष्यातील पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. आंजर्ले, ओनणवसे, मुर्डी, उंबरशेत, नवसे, केळशी, उटंबर, आतगाव, कौडोली, रावतोली, चिखलगाव, शिरखळ, उन्हवरे, फरारे, उंबर्ले या गावांमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. या गावांची पाहणी देखील करण्यात आली असून, लवकरच या ठिकाणी पाण्याचे टँकर पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)