शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गतवर्षीपेक्षा पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: April 24, 2016 00:40 IST

कमी पावसाचे दुष्परिणाम : टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या ६० वर; पाण्यासाठी वणवण सुरू

रत्नागिरी : कमी पाऊस पडल्याचे दुष्परिणाम ऐन उन्हाळ्यात जाणवत असून, आज जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील ३४ गावांमधील ६० वाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आजची पाणीटंचाई गतवर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळा सुरु असला तरी गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षीचा उन्हाळा कडक असल्याचे जाणवत आहे. विहिरी, नाले, तलाव, आदी पाण्याचे स्रोत आटत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे असल्याने भयंकर उकाडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याचे बाष्पीभवन जलदगतीने होत असून, जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया झपाट्याने होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील २२ गावांमधील ३६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती़ या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ३ खासगी टँकर्स अशा एकूण ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये आता १२ गावांमधील २४ वाड्यांची भर पडली आहे़ या टंचाईग्रस्तांना शासकीय ८ आणि खासगी २ अशा एकूण १० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाकडून टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे़ मात्र, प्रत्यक्षात त्यांना दोन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ यामुळे टंचाईग्रस्तांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़ दिवसेंदिवस या पाणीटंचाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)दापोलीत १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा!दापोली : दापोलीतील पंधरा गावांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने येथून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली असून, देवाचा डोंगर येथे मात्र मार्च महिण्यापासूनच टँकर धावू लागला आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. तसेच उन्हाचा कडाका देखील दिवसेंदिवस वाढत चालला असून, दापोलीतील काही गावांमधील पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मार्च महिन्यापासूनच जामगे देवाचा डोंगर व मंडणगड मधील भोलवली देवाचा डोंगर येथे पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. परंतु, उन्हाचा कडाका पाहता भविष्यातील पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. आंजर्ले, ओनणवसे, मुर्डी, उंबरशेत, नवसे, केळशी, उटंबर, आतगाव, कौडोली, रावतोली, चिखलगाव, शिरखळ, उन्हवरे, फरारे, उंबर्ले या गावांमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. या गावांची पाहणी देखील करण्यात आली असून, लवकरच या ठिकाणी पाण्याचे टँकर पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)