शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

चिपळुणात आठ गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

चिपळूण : कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने चिपळूण तालुक्यातील आठ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी ...

चिपळूण : कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने चिपळूण तालुक्यातील आठ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी या गावांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडे शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने त्यांतील एकाही गावाला अद्याप पाणीपुरवठा झालेला नाही.

तालुक्यात कादवड, नारदखेरकी, कोसबी, अडरे, कामथे खुर्द, नांदगाव या सहा गावांतील काही वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज अंतिम मंजुरीसाठी तहसील व प्रांत कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. शहरालगतच्या धामणवणे व टेरव गावांतील वाड्यांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्याने धामणवणेचे सरपंच सुनील सावंत यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे धाव घेतली होती.

टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज आले असले तरी शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील तहसील कार्यालयाकडून खासगी टँकर अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे.

प्रशासनाने गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा ठेका घेतलेल्या मनीषा कन्स्ट्रन्शन कंपनीला, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चेतक व ईगल कंपनीला तसेच गाणे-खडपोली येथील साफयीस्ट कंपनीकडे पत्रव्यवहार करून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र या तिन्ही खासगी कंपन्यांकडून प्रशासनाच्या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वारे नामक व्यक्तीने आपल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली असून, त्या टँकरचे अधिग्रहण करून लवकरच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.