शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

जल सप्ताहात राबविणार पाणी वाचविण्याचे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST

........................................... लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पाण्याची गळती थांबवणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे, नादुरुस्त स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी पूरक उपक्रम ...

...........................................

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पाण्याची गळती थांबवणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे, नादुरुस्त स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी पूरक उपक्रम जल सप्ताहामध्ये राबवावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेकडून पंचायत समित्यांना करण्यात आली आहे. २२ पासून सुरू झालेला जल सप्ताह २७ मार्चपर्यंत चालणार आहे.

पाणी हेच जीवनमात्राच्या उत्पत्तीचे व संवर्धनासाठीचे प्रमुख कारण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सन १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा ‘जागतिक जलदिन’ साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने जलशपथ घेऊन जिल्हा परिषदेकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठ्यासाठी वापरात येणाऱ्या जलस्रोतांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच पाणीगळती थांबविणे गरजेचे आहे. याकरिता पूरक ठरणारे विविध उपक्रम २७ मार्चपर्यंत राबविण्याचे नियोजन करण्याबाबत सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आली आहे. या वर्षीच्या जागतिक जलदिनाचे ब्रीदवाक्य ‘पाण्याचे मूल्य’ हे आहे. याचाच एक भाग म्हणून दापोलीतील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानच्या प्रशांत परांजपे यांनी 'पाणी वाचवा : जलसंवाद व घनकचरा सांडपाणी' याबाबत जिल्हा परिषदेत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घोणेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपाध्ये, वरिष्ठ भूवैज्ञानिक माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नरेगाचे साळुंखे व जिल्हा कक्षातील सर्व तज्ज्ञ / सल्लागार व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक जलदिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.