शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

पाण्यासाठी वणवण...

By admin | Updated: January 15, 2016 00:23 IST

संगमेश्वर तालुका : पाचांबे जखणीचे टेप ग्रामस्थांची व्यथा

सुभाष कदम -- चिपळूण -संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे जखणीचे टेप येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी आजही भटकंती सुरु आहे. या ग्रामस्थांच्या नशिबी आलेली ही वणवण कधी दूर होणार, याकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत. सन २००८ पासून या ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.जखणीचे टेप ही वाडी ज्या ठिकाणी विस्थापित करण्यात आली त्याठिकाणी पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. तसेच स्वेच्छा पुनर्वसन असल्याने पाटबंधारे विभागाला विकासकामांसाठी निधी खर्च करण्यात अडचणी येत आहेत. स्वेच्छा पुनर्वसन गावठाणासाठी पुनर्वसन विभागाकडून अतिरिक्त खर्च करण्याला निर्बंध असतात. स्वेच्छा पुनर्वसन घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमीन व घरासह मोबदला दिला जातो. स्वेच्छा पुनर्वसन गावठाण विकासाचे दायित्व हे स्थानिक स्वराज्य संस्थाचे असते. पुनर्वसन गावठाणाला वीज, पाणी, रस्ता या सुविधा जिल्हा परिषदेने पुरविणे महत्त्वाचे असते. जखणीचे टेप येथे सुरुवातीपासूनच पाण्याची मोठी समस्या होती. संगमेश्वर तालुक्याचे तत्कालीन आमदार सुभाष बने यांच्या प्रयत्नातून या गावठाणात ८ लाखाची विहीर बांधण्यात आली होती. मात्र, या विहिरीतील पाण्याचा साठा हा मर्यादित असल्याने पाणीटंचाईची झळ बसू लागली. विशेष करुन उन्हाळी हंगामात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे यांनी जखणीचे टेप येथे टँकर सुरु करावा, अशी मागणी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. त्यानंतर येथे हंगामी कालावधीसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, या गावठाणाला बारमाही पाणी पुरवठा करणारी एखादी नळपाणी योजना राबवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पाचांबे जखणीचे टेपमधील गायी, म्हैशी सांभाळणारे शेतकरी सध्या नायरी येथून विकत पाणी आणत आहेत. हे विकत आणलेले पाणी किती दिवस पुरवणार, या विवंचनेत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. पंचायत समितीकडून होळीनंतर सुरु होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकर सुरु करण्यात येतो. मात्र, टँकरमधून पुरवण्यात येणारे अपुरे पाणी घेण्यावरुनही ग्रामस्थांमध्ये मतभेद होतात. टँकरसह जंगलातल्या पाणवठ्याचा आधार घेत भटकंती करावी लागत आहे. ही भटकंती थांबवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. स्वेच्छा पुनर्वसनात अतिरिक्त खर्च करण्याला निर्बंध आहेत.प्रकल्पग्रस्तांना जमीन व घरासह मोबदला दिला जातो.विकासाचे दायित्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे.उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.स्वेच्छा पुनवर्सनपाचांबे जखणीचे टेप ही वाडी पूर्वी धरणातील बुडीत क्षेत्रात होती. सन २००८ला या वाडीचे स्वेच्छा पुनर्वसन होऊन जखणीचे टेप येथे विस्थापित झाली.