शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

रत्नागिरी तालुक्यात चांदेराई, तोणदे येथे पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, ...

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, तोणदे या गावांमधील घरांमध्ये पाणी भरले. टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा प्रदीप पवार (५५ वर्षे) या लस घेण्यासाठी जात असताना वाटेत असलेल्या पऱ्यात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांचा बूडून मृत्यू झाला. शहरानजिकच्या मिऱ्या येथील पंधरामाड येथेही भरतीचे पाणी घुसले.

तालुक्यात बुधवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदेराई गावाला पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला. यामुळे रात्रीच्या सुमारास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्याने या बाजारपेठेतील सुमारे १०० दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. या गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढत असून, चांदेराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने आता काही घरांमध्येदेखील पाणी शिरले आहे.

चांदेराईपाठोपाठ काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या अन्य गावांनादेखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका आता तोणदे गावाला बसला असून, अनेक घरांमधून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा पवार या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी जात होत्या. हातीस स्टॉप येथे येत असताना आडकरवाडी येथील दुथडी भरून वाहणाऱ्या पऱ्यामध्ये त्या पाय घसरून पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या झाडाला अडकलेल्या स्थितीत सापडला. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.

बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने शहरानजिकच्या पंधरामाड-कांबळेवाडी परिसरातील सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यातदेखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील ग्रामस्थांना समुद्रापासून धोका निर्माण होणार आहे.