शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

रत्नागिरी तालुक्यात चांदेराई, तोणदे येथे पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, ...

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, तोणदे या गावांमधील घरांमध्ये पाणी भरले. टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा प्रदीप पवार (५५ वर्षे) या लस घेण्यासाठी जात असताना वाटेत असलेल्या पऱ्यात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांचा बूडून मृत्यू झाला. शहरानजिकच्या मिऱ्या येथील पंधरामाड येथेही भरतीचे पाणी घुसले.

तालुक्यात बुधवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदेराई गावाला पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला. यामुळे रात्रीच्या सुमारास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्याने या बाजारपेठेतील सुमारे १०० दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. या गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढत असून, चांदेराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने आता काही घरांमध्येदेखील पाणी शिरले आहे.

चांदेराईपाठोपाठ काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या अन्य गावांनादेखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका आता तोणदे गावाला बसला असून, अनेक घरांमधून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा पवार या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी जात होत्या. हातीस स्टॉप येथे येत असताना आडकरवाडी येथील दुथडी भरून वाहणाऱ्या पऱ्यामध्ये त्या पाय घसरून पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या झाडाला अडकलेल्या स्थितीत सापडला. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.

बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने शहरानजिकच्या पंधरामाड-कांबळेवाडी परिसरातील सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यातदेखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील ग्रामस्थांना समुद्रापासून धोका निर्माण होणार आहे.