शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रत्नागिरी तालुक्यात चांदेराई, तोणदे येथे पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, ...

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, तोणदे या गावांमधील घरांमध्ये पाणी भरले. टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा प्रदीप पवार (५५ वर्षे) या लस घेण्यासाठी जात असताना वाटेत असलेल्या पऱ्यात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांचा बूडून मृत्यू झाला. शहरानजिकच्या मिऱ्या येथील पंधरामाड येथेही भरतीचे पाणी घुसले.

तालुक्यात बुधवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदेराई गावाला पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला. यामुळे रात्रीच्या सुमारास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्याने या बाजारपेठेतील सुमारे १०० दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. या गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढत असून, चांदेराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने आता काही घरांमध्येदेखील पाणी शिरले आहे.

चांदेराईपाठोपाठ काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या अन्य गावांनादेखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका आता तोणदे गावाला बसला असून, अनेक घरांमधून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा पवार या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी जात होत्या. हातीस स्टॉप येथे येत असताना आडकरवाडी येथील दुथडी भरून वाहणाऱ्या पऱ्यामध्ये त्या पाय घसरून पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या झाडाला अडकलेल्या स्थितीत सापडला. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.

बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने शहरानजिकच्या पंधरामाड-कांबळेवाडी परिसरातील सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यातदेखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील ग्रामस्थांना समुद्रापासून धोका निर्माण होणार आहे.