शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी तालुक्यात चांदेराई, तोणदे येथे पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, ...

रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, तोणदे या गावांमधील घरांमध्ये पाणी भरले. टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा प्रदीप पवार (५५ वर्षे) या लस घेण्यासाठी जात असताना वाटेत असलेल्या पऱ्यात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांचा बूडून मृत्यू झाला. शहरानजिकच्या मिऱ्या येथील पंधरामाड येथेही भरतीचे पाणी घुसले.

तालुक्यात बुधवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदेराई गावाला पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला. यामुळे रात्रीच्या सुमारास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्याने या बाजारपेठेतील सुमारे १०० दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. या गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढत असून, चांदेराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने आता काही घरांमध्येदेखील पाणी शिरले आहे.

चांदेराईपाठोपाठ काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या अन्य गावांनादेखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका आता तोणदे गावाला बसला असून, अनेक घरांमधून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा पवार या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी जात होत्या. हातीस स्टॉप येथे येत असताना आडकरवाडी येथील दुथडी भरून वाहणाऱ्या पऱ्यामध्ये त्या पाय घसरून पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या झाडाला अडकलेल्या स्थितीत सापडला. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.

बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने शहरानजिकच्या पंधरामाड-कांबळेवाडी परिसरातील सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यातदेखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील ग्रामस्थांना समुद्रापासून धोका निर्माण होणार आहे.