शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मच्छिमारांना ४८ कोटी रुपये परताव्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

रत्नागिरी : कोरोना, वातावरणातील सतत बदल आणि वादळांमुळे खोल समुद्रातील मासेमारीला कालावधी कमी मिळाला. या परिस्थितीतून सावरणाऱ्या मच्छिमारांना डिझेल ...

रत्नागिरी : कोरोना, वातावरणातील सतत बदल आणि वादळांमुळे खोल समुद्रातील मासेमारीला कालावधी कमी मिळाला. या परिस्थितीतून सावरणाऱ्या मच्छिमारांना डिझेल परताव्याचे ४८ कोटी रुपयांची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या आर्थिक साहाय्याची गरज असतानाही शासनाकडून मच्छिमारांना दिलासा मिळत नसल्याने मच्छिमारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मच्छिमारांना केवळ आठ कोटी रुपये परताव्याची रक्कम देण्यात आली. गेल्या दोन वर्षांत कोकणाने अनेक संकटांचा सामना केला आहे. कोरोनापाठोपाठ निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. मागील दोन वर्षांत सर्वच व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. कोकणचा आर्थिक कणा ओळखला जाणारा मच्छिमारी व्यवसायही त्यामधून सुटलेला नाही. अस्मानी संकटासोबतच नैसर्गिक संकटाने मच्छिमार उद्ध्वस्त झाला आहे. दरवेळी पोकळ आश्वासन देऊन मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जाते. त्यातच मच्छिमारांच्या हक्काचा डिझेल परताव्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे.

जिल्ह्यात २७५० मच्छिमारांच्या हक्काचा डिझेल परतावा गेली साडेतीन वर्षे रत्नागिरीतील मच्छिमारांना अद्याप मिळालेला नाही. दरवेळी डिझेल परताव्याचा प्रश्न सुटला अशी घोषणा होते. प्रत्यक्षात मच्छिमार डिझेल परताव्यापासून गेली साडेतीन वर्षे वंचित राहिला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.