शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापर संस्थांची ११ वर्षे प्रतीक्षा

By admin | Updated: April 7, 2016 23:59 IST

खेड तालुक्यातील परिस्थिती : नातूवाडी प्रकल्पाच्या उपअभियंत्यांची कबुली

श्रीकांत चाळके -- खेड --खेड तालुक्यातील धरण हद्दीमध्ये अद्याप पाणीवापर संस्थाच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ ११ वर्ष लोटली तरीही या धरण हद्दीमध्ये एकही पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली नसल्याचे नूतन उपअभियंता मंगले यांनी सांगितले. आम्ही लवकरच या संस्था स्थापन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.धरण हद्दीतील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येण्यासाठी आणि त्या दृष्टीने स्वतंत्र एजन्सी म्हणून राज्य सरकारने २००५ मध्ये केलेल्या सिंचन व्यवस्थापन कायद्यांतर्गत या समित्यांची स्थापना करण्यास अनुमती दिली आहे़ मात्र, यावर ११ वर्षे उलटून गेली तरीही खेड तालुक्यातील धरण हद्दीत पाणीवापर संस्था कार्यरत नसल्याचेच उपअभियंत्यांच्या खुलाशाने समोर आले आहे. काही संस्थांचा अपवाद वगळता अनेक संस्था आजही केवळ कागदावर असल्याचे यातून समोर आले आहे़ अस्तित्वात असलेल्या संस्था या केवळ नावापुरत्या असून, संस्थेच्या बैठकाही अपवादात्मक परिस्थितीत घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.़ महत्वाचे निर्णय घेताना धरण प्रशासन अशा संस्थांना विश्वासात घेत नसल्याने या संस्था केवळ नामधारी असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे़ राज्य सरकारने लागू केलेला सिंचन व्यवस्थापन कायदा हा सर्वच पाटबंधारे प्रकल्पांना लागू करण्यात आला आहे़ खेड तालुक्यातील सात धरणांच्या हद्दीत या पाणीवापर संस्था स्थापन करणे आवश्यक होते.़ विशेषत: शिरवली येथील धरण हद्दीत ५ वर्षापूर्वी एकमेव अशी पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली आहे़ या धरणाच्या हद्दीत ३ गावांचा समावेश असून, येथील शेकडो एकर जमीन ही ओलिताखाली आहे़ मात्र, या धरणाचे दोन्ही कालवे नादुरूस्त असल्याने या समितीचे कामकाज जवळपास बंदच आहे़ सध्या या कालव्यांचे काम सुरू असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर सिंचनाचे काम या समितीकडे सोपवण्यात येणार आहे़ तसेच ही समिती स्थापन झाल्यांनतर ३ वर्षे या समितीची एकही बैठक झालेली नाही़ याविषयी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने समितीची बैठक होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले. खोपी आणि कोंडीवली धरण हद्दीत अद्याप अशा समित्यांची स्थापना करण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे़ मुबलक पाणीसाठा असूनही या दोन्ही धरणातील पाण्याचा सिंचनासाठी वापर होत नाही़ त्यामुळे या समित्या कधी स्थापन करणार आणि त्यानंतर पाण्याचा सिंचनासाठी केव्हा आणि कोठे वापर करणार याविषयी नि:संदिग्ध माहिती मिळत नाही़ पाण्याचा साठा असलेल्या धरण हद्दीत निधी मंजूर झाल्यानंतर काम हाती घेण्यासाठी प्रती ५०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी संस्था स्थापण करणे गरजेचे आहे़ अशा ५ संस्था स्थापन करण्यात येणार आहेत़ येथील उजव्या कालव्याच्या क्षेत्रात तीन आणि डाव्या कालव्याच्या क्षेत्रात दोन संस्था स्थापन करण्यात येणार आहेत़ याच संस्था पाण्याचे सिंचन व्यवस्थापन करणार असल्याची माहिती मिळाली आहे़ मात्र, अद्याप या संस्था स्थापन झालेल्या नाहीत. या संस्था स्थापन करण्यासाठी संबंधित अधिकारीच उदासीन असल्याचे दिसून येत आहे़ पाण्याची सिंचन क्षमता पूर्ण करण्यासाठी माणी- शेलारवाडी, पोयनार, न्यू मांडवे या धरणांचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे़ या धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याशिवाय येथील पाणी सिंचनाकरिता वापरण्यात येणार नाही़ नातूवाडी धरण हद्दीतील १८ लाभक्षेत्र गावात व वाडीत जनजागृती मोहीम राबविण्यात येते़ येथील १८ गावांमधून नोव्हेंबर २०१२मध्ये पाच पाणीवापर संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती़ मात्र, ११ वर्षे लोटली तरीही या संस्था स्थापन करण्यात आल्या नसून, त्यांची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना त्रासदायक : उत्सुकता कमीपाणीवापर संस्था ग्रामसभेमध्ये स्थापन करण्यात येतात़ यावेळी सर्वसंमतीने ९ सदस्यांची निवड केली जाते़ यातील एका जरी सदस्याला विरोध झाला तरी संस्थेचे कामकाज बंद पडणार आहे़ त्यामुळे अधिकाऱ्यांनाही ते त्रासदायक ठरणार असल्याने या समित्या स्थापन करण्याच्या कामात कोणीही उत्सुक नसल्याचेच दिसून येत आहे़ सिंचनाचा प्रश्नसमित्या गठीत झाल्या नसल्याने धरणातील पाण्याचे वितरण कामात देखील अडचणी उद्भवणार आहेत़ संस्था नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़