शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा अवघ्या काही तासांचीच!

By admin | Updated: October 19, 2014 00:30 IST

मतमोजणी आज : धडधड वाढते ठोक्यात... अशीच उमेदवारांची अवस्था

रत्नागिरी : अनेक निवडणुका एकत्र लढून आता एकमेकांसमोर उभे राहिलेले चार प्रमुख पक्ष, आयत्यावेळी झालेले निर्णय, प्रचाराला मिळालेला कमी कालावधी आणि आयत्या क्षणी झालेली पक्षांतरे यामुळे गाजलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (रविवारी) होत आहे. आतापर्यंत एकत्र फिरणारेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होत असून, बारा ते एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. अनेकांचे राजकीय अस्तित्त्व ठरवणार निकाल काही तासांवर येऊन ठेपल्याने ‘धडधड वाढते ठोक्यात...’ अशी उमेदवारांची अवस्था झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघांमध्ये ४४ उमेदवार रिंगणात आहेत.जिल्ह्यात सर्वात चुरशीची निवडणूक होत आहे ती रत्नागिरी विधानसभा मतदार संघात केवळ याच मतदार संघात. आतापर्यंतच्या बहुतांश निवडणुका काँग्रेस विरूद्ध भाजप, राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशा झाल्या आहेत. यावेळी मात्र या मतदार संघात शिवसेना विरूद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. येथे उदय सामंत यांनी केलेले पक्षांतर आणि नरेंद्र मोदी यांची सभा या दोन गोष्टी गाजल्या. एरवी एकमेकांसोबत लढणारे कार्यकर्ते यावेळी एकमेकांविरूद्ध लढल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वाधिक औत्स्युक्याची निवडणूक होणार आहे ती चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात. येथे शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार सर्वार्थाने तुल्यबळ असल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे औत्स्युक्य आहे.गुहागर-खेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. शिवसेनेचे विजय भोसले यांना किती मते मिळतात, यावर नातूंचे भवितव्य अवलंबून असल्याने गुहागर मतदार संघही चर्चेचा झाला आहे.राजापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे राजन साळवी आणि काँग्रेसचे राजन देसाई यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. भाजपचे उमेदवार संजय यादवराव किती मते मिळवतात, यावर राजन साळवी यांच्या विजयाची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष यादवराव यांच्या मतांकडे लागले आहे.जिल्ह्यात केवळ दापोली मतदार संघातच बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांनी अधिकृत उमेदवार संजय कदम यांच्याविरोधात बंड केले आहे. या मतदार संघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांच्यामध्ये मुख्य लढत होत असली तरी मनसेचे वैभव खेडेकर आणि भाजपचे केदार साठे यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नसल्याने या निकालाबाबतही औत्स्युक्य आहे. (प्रतिनिधी)