शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आता प्रतीक्षा अवघ्या काही तासांचीच!

By admin | Updated: October 19, 2014 00:30 IST

मतमोजणी आज : धडधड वाढते ठोक्यात... अशीच उमेदवारांची अवस्था

रत्नागिरी : अनेक निवडणुका एकत्र लढून आता एकमेकांसमोर उभे राहिलेले चार प्रमुख पक्ष, आयत्यावेळी झालेले निर्णय, प्रचाराला मिळालेला कमी कालावधी आणि आयत्या क्षणी झालेली पक्षांतरे यामुळे गाजलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (रविवारी) होत आहे. आतापर्यंत एकत्र फिरणारेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होत असून, बारा ते एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. अनेकांचे राजकीय अस्तित्त्व ठरवणार निकाल काही तासांवर येऊन ठेपल्याने ‘धडधड वाढते ठोक्यात...’ अशी उमेदवारांची अवस्था झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघांमध्ये ४४ उमेदवार रिंगणात आहेत.जिल्ह्यात सर्वात चुरशीची निवडणूक होत आहे ती रत्नागिरी विधानसभा मतदार संघात केवळ याच मतदार संघात. आतापर्यंतच्या बहुतांश निवडणुका काँग्रेस विरूद्ध भाजप, राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशा झाल्या आहेत. यावेळी मात्र या मतदार संघात शिवसेना विरूद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. येथे उदय सामंत यांनी केलेले पक्षांतर आणि नरेंद्र मोदी यांची सभा या दोन गोष्टी गाजल्या. एरवी एकमेकांसोबत लढणारे कार्यकर्ते यावेळी एकमेकांविरूद्ध लढल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वाधिक औत्स्युक्याची निवडणूक होणार आहे ती चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात. येथे शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार सर्वार्थाने तुल्यबळ असल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे औत्स्युक्य आहे.गुहागर-खेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. शिवसेनेचे विजय भोसले यांना किती मते मिळतात, यावर नातूंचे भवितव्य अवलंबून असल्याने गुहागर मतदार संघही चर्चेचा झाला आहे.राजापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे राजन साळवी आणि काँग्रेसचे राजन देसाई यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. भाजपचे उमेदवार संजय यादवराव किती मते मिळवतात, यावर राजन साळवी यांच्या विजयाची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष यादवराव यांच्या मतांकडे लागले आहे.जिल्ह्यात केवळ दापोली मतदार संघातच बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांनी अधिकृत उमेदवार संजय कदम यांच्याविरोधात बंड केले आहे. या मतदार संघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांच्यामध्ये मुख्य लढत होत असली तरी मनसेचे वैभव खेडेकर आणि भाजपचे केदार साठे यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नसल्याने या निकालाबाबतही औत्स्युक्य आहे. (प्रतिनिधी)