शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

विजय बंधारेदोन हजारचा टप्पा पार

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद : लोकसहभागातून वनराई,

  रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई व विजय बंधाऱ्यांची कामे जोरदार असून, महिनाभराच्या कालावधीत बंधाऱ्यांनी २०००चा टप्पा ओलांडला असल्याने लाखो लीटर्स पाणी अडविण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये जूनच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावातील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई व विजय बंधारे उभारण्याचा निश्चिय केला. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला जिल्हाभरात ८ हजार ४६० बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करण्याचे आदेश दिले. पावसाळ्याचे दिवस संपल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सर्वच बंधारे बांधण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले. ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या सहाय्याने श्रमदानाने बंधारे बांधले जात आहेत. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा अधिकाधिक सहभाग असावा, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार स्वत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरुन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बंधारे उभारण्यास प्रोत्साहन देत आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख आणि जिल्हा मोहीम अधिकारी विनोदकुमार शिंदे हे प्रत्येक तालुक्यात जाऊन कामाचा आढावा घेत आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी व्यक्त केला. पाणीटंचाईवर मात : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रोत्साहन २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी गावागावांमध्ये वनराई, विजय व कच्च्या बंधाऱ्यांच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. महिनाभराच्या कालावधीत बंधाऱ्यांची सुमारे २०७० कामे पूर्ण करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचा चांगला परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होता. मागील वर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. हे बंधारे मग्रारोहयोतून उभारले जात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बंधाऱ्यांची गरज भासू लागली आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे भविष्यात पाणीटंचाईची झळ बसू शकते. त्यामुळेच वनराई बंधारे बांधले जात आहेत.