शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

विजय बंधारेदोन हजारचा टप्पा पार

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद : लोकसहभागातून वनराई,

  रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई व विजय बंधाऱ्यांची कामे जोरदार असून, महिनाभराच्या कालावधीत बंधाऱ्यांनी २०००चा टप्पा ओलांडला असल्याने लाखो लीटर्स पाणी अडविण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये जूनच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावातील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई व विजय बंधारे उभारण्याचा निश्चिय केला. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला जिल्हाभरात ८ हजार ४६० बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करण्याचे आदेश दिले. पावसाळ्याचे दिवस संपल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सर्वच बंधारे बांधण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले. ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या सहाय्याने श्रमदानाने बंधारे बांधले जात आहेत. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा अधिकाधिक सहभाग असावा, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार स्वत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरुन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बंधारे उभारण्यास प्रोत्साहन देत आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख आणि जिल्हा मोहीम अधिकारी विनोदकुमार शिंदे हे प्रत्येक तालुक्यात जाऊन कामाचा आढावा घेत आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी व्यक्त केला. पाणीटंचाईवर मात : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रोत्साहन २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी गावागावांमध्ये वनराई, विजय व कच्च्या बंधाऱ्यांच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. महिनाभराच्या कालावधीत बंधाऱ्यांची सुमारे २०७० कामे पूर्ण करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचा चांगला परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होता. मागील वर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. हे बंधारे मग्रारोहयोतून उभारले जात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बंधाऱ्यांची गरज भासू लागली आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे भविष्यात पाणीटंचाईची झळ बसू शकते. त्यामुळेच वनराई बंधारे बांधले जात आहेत.