शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

वाशीत आंब्याची आवक वाढली

By admin | Updated: February 2, 2016 23:44 IST

दर घसरले : बागायतदारांना दरवाढीची अपेक्षा

रत्नागिरी : पावसाअभावी पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे हंगामापेक्षाही लवकर तयार झाला असून, बाजारात त्याची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून वाशी बाजारात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. दररोज ८०० ते ९०० आंबा पेट्या वाशी बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत असून, ५०० ते १००० रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली. पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून कमी राहिल्याने यावर्षी सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला. कमी पावसामुळे झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे पालवी कडक होऊन मोहोर प्रक्रिया लांबली; परंतु समुद्रकिनाऱ्यालगतच्या ४ ते ५ किलोमीटर परिसरात आंब्याला मोहोर लवकर आला. पाऊस नसल्यामुळे मोहोर टिकला. शिवाय त्याला झालेल्या फळधारणेवरही कोणताच परिणाम झाला नाही. वास्तविक दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यानंतर आंबा विक्री सुरू होते. मात्र, यावर्षी हंगामापूर्वीच अर्थात जानेवारीलाच आंबा बाजारात आला आहे. वाशी बाजाराबरोबर अहमदाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली बाजारामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. अन्य शहरांतील बाजारांपेक्षा मुंबई बाजारकडे बागायतदारांचा ओढा अधिक आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून जास्त आंबा मुंबईकडेच पाठविला जात आहे. हजाराच्या घरात आंबा पेट्या बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत आहेत. आंबा चांगल्या प्रमाणात विक्रीसाठी आला असला तरी दर मात्र घसरले आहेत. ५०० ते १००० रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू आहे. पेटीला २५०० ते ४००० रुपये इतकाच दर मिळणार आहे. स्थानिक बाजारपेठेतही आंबा गेल्या आठवड्यापासून विक्रीस आला आहे. कच्चा आंबा ५०० ते १००० रुपये डझन, तर पिकलेले आंबे ८०० ते १२०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. कैरी २०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. वाशी बाजारमध्ये कैरीचे करंडे अथवा पोते विक्रीस पाठविण्यात येत आहे. २०० रुपये किलो इतक्या अल्प दराने कैरी विकली जात आहे. आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधन खर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तुटपुंजी आहे. उन्हामुळे आंबा लवकर तयार होत असला तरी काही शेतकरी आंबा तोडण्याची घाई करीत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे. (प्रतिनिधी)