शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वाशीत आंब्याची आवक वाढली

By admin | Updated: February 2, 2016 23:44 IST

दर घसरले : बागायतदारांना दरवाढीची अपेक्षा

रत्नागिरी : पावसाअभावी पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे हंगामापेक्षाही लवकर तयार झाला असून, बाजारात त्याची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून वाशी बाजारात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. दररोज ८०० ते ९०० आंबा पेट्या वाशी बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत असून, ५०० ते १००० रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली. पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून कमी राहिल्याने यावर्षी सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला. कमी पावसामुळे झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे पालवी कडक होऊन मोहोर प्रक्रिया लांबली; परंतु समुद्रकिनाऱ्यालगतच्या ४ ते ५ किलोमीटर परिसरात आंब्याला मोहोर लवकर आला. पाऊस नसल्यामुळे मोहोर टिकला. शिवाय त्याला झालेल्या फळधारणेवरही कोणताच परिणाम झाला नाही. वास्तविक दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यानंतर आंबा विक्री सुरू होते. मात्र, यावर्षी हंगामापूर्वीच अर्थात जानेवारीलाच आंबा बाजारात आला आहे. वाशी बाजाराबरोबर अहमदाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली बाजारामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. अन्य शहरांतील बाजारांपेक्षा मुंबई बाजारकडे बागायतदारांचा ओढा अधिक आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून जास्त आंबा मुंबईकडेच पाठविला जात आहे. हजाराच्या घरात आंबा पेट्या बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत आहेत. आंबा चांगल्या प्रमाणात विक्रीसाठी आला असला तरी दर मात्र घसरले आहेत. ५०० ते १००० रुपये डझन दराने आंब्याची विक्री सुरू आहे. पेटीला २५०० ते ४००० रुपये इतकाच दर मिळणार आहे. स्थानिक बाजारपेठेतही आंबा गेल्या आठवड्यापासून विक्रीस आला आहे. कच्चा आंबा ५०० ते १००० रुपये डझन, तर पिकलेले आंबे ८०० ते १२०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. कैरी २०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. वाशी बाजारमध्ये कैरीचे करंडे अथवा पोते विक्रीस पाठविण्यात येत आहे. २०० रुपये किलो इतक्या अल्प दराने कैरी विकली जात आहे. आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधन खर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तुटपुंजी आहे. उन्हामुळे आंबा लवकर तयार होत असला तरी काही शेतकरी आंबा तोडण्याची घाई करीत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे. (प्रतिनिधी)