शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाचा त्रास कमी करण्यासाठी त्यातल्या त्यात प्रभावी उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाचा त्रास कमी करण्यासाठी त्यातल्या त्यात प्रभावी उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लसीकरणाला आता काहीशी गती येऊ लागली आहे. सुरुवातीपासून कासवगतीने होणाऱ्या लसीकरणाला आता चांगलाच वेग आला असून, ऑगस्ट महिन्यात दोन्ही डोसच्या सुमारे १ लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत.

जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाला आता खऱ्या अर्थाने गती आली असली तरी अजून जिल्ह्यात केवळ १६ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे.

जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या फळीतील कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू झाले. अगदी मार्चअखेरपर्यंत लसीकरणाला गती आली नव्हती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात गैरसमजच अधिक होते. त्यामुळे ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही प्रतिसाद कमी होता. मात्र शिमग्यानंतर दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला आणि अचानक लोकांना लसीकरणाचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर रांगा दिसू लागल्या.

ज्यावेळी लोकांना लसीकरणाचे महत्त्व कळले, त्यावेळेपासून डोस कमी प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लसीकरणाच्या कामात चांगलाच खंड पडू लागला. मे महिन्यात तर कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईतील लोकही लसीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर येऊ लागले होते. मात्र डोसची उपलब्धता खूप कमी असल्याने अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी त्यावरून वाद झाले.

ऑगस्ट महिन्यात मात्र डोस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लसीकरणाने आता चांगला वेग घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात रोज लस उपलब्ध होती. एका दिवशी सर्वाधिक २१ हजारांहून अधिक लसीकरण झाले. १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार २१४ लोकांनी पहिला तर १ लाख १२ हजार ५२१ लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. ३१ ऑगस्ट रोजी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ६३७ इतकी तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या २ लाख १० हजार ३४३ इतकी झाली आहे. पहिल्या मात्रेच्या संख्येत १ लाख १० हजार ४२३ तर दुसऱ्या मात्रेच्या संख्येत ९७ हजार ८२२ लोकांची भर पडली आहे.

सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे. दोन्ही लस घेतलेल्यांना जरी कोरोना झाला तरी त्याची लक्षणे सौम्य असतात. दुसरी लाट प्रभावी झाल्यानंतर त्याचे महत्त्व लोकांना कळले आहे.