शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रिफायनरी समर्थनार्थ पाचल ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून दोन दिवस जोरदार मंथन सुरू असतानाच प्रस्तावित ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून दोन दिवस जोरदार मंथन सुरू असतानाच प्रस्तावित रिफायनरीच्या समर्थनार्थ आता प्रकल्प क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायती पुढे सरसावल्या आहेत. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाचलने रिफायनरीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर करून तालुक्यातच प्रकल्प राहावा, अशी मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांत उठावदार कामगिरी करताना शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पाचल ग्रामपंचायतीने राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ एकमुखी ठराव केला आहे. मंगळवारी (दि. २९) पाचल ग्रामपंचायतीच्या बैठकीत तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा मुद्दा चर्चेत आला. कोविडमुळे निर्माण झालेला रोजगारीचा प्रश्न पाहता रिफायनरी प्रकल्प होणे ही काळाची गरज असून, त्याच्या समर्थनाचा ठराव पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांनी मांडला. त्याला पाचलचे ज्येष्ठ सदस्य शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मत व्यक्त केले आणि एकमताने प्रस्तावित रिफायनरीचा ठराव मंजूर झाला.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आता राजापूर तालुक्यात जनजागृती होऊ लागली असून, प्रकल्प मार्गी लागावा म्हणून ठरावही करण्याचा निर्णय विविध ग्रामपंचायतींनी घेतल्याचे समजते.

चौकट

कोविडच्या महामारीमुळे रोजगारीबाबत निर्माण झालेली परिस्थिती, प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रोजगारासाठी उपयुक्त ठरणारा आहे. शिवाय तालुक्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्याचा विचार करून आम्ही रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव मंजूर केला आहे.

- शंकर ऊर्फ अण्णा पाथरे, ग्रामपंचायत सदस्य, पाचल