शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उकाडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST

रत्नागिरी : दिवसेंदिवस उकाड्याचा त्रास होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या तापमानाचा पारा अधिकाधिक चढू लागला आहे. त्यामुळे ...

रत्नागिरी : दिवसेंदिवस उकाड्याचा त्रास होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या तापमानाचा पारा अधिकाधिक चढू लागला आहे. त्यामुळे उश्म्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. घामाच्या धारा असह्य होऊ लागल्या असल्याने नागरिकांना शीतपेयाचा आधार घ्यावा लागत आहे.

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

देवरूख : चिपळूण, तसेच संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या महिन्यापासून कुचांबे, कुंभारखणी, आरवली, माखजन आदी भागात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्लास्टीक पिशव्यांची विक्री

रत्नागिरी : रत्नागिरीसह महाराष्ट्रात प्लास्टीक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. कमी मायक्रोच्या पिशव्या विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील काही व्यावसायिकांकडून कमी जाडीच्या पिशव्या वापरल्या जात असून, त्यावर व्यावसायिकांकडून स्वत:चे नाव आणि दुकानाचे नाव घालून दिले जात आहे.

भरपाईची मागणी

खेड : अवकाळी पावसाने तालुक्यातील आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात झालेल्या या पावसाने मोठेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशके, खते मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. मात्र, तरीही मोहर आणि फळे गळून पडली आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

कचऱ्याकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : शहरातील ओसवालनगर भागातील कचराकुंडी उचलण्यात आली असतानाही, परिसरातील नागरिक कचरा टाकत आहेत. मात्र, त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारत असल्याने हा कचरा इतस्तत: पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे.

खुलेआम गुटखा विक्री

रत्नागिरी : राज्यात उत्पादन व विक्रीला बंदी असतानाही गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तेथील टपऱ्यांवरही गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाने बंदी आणली, तरी त्याचा उपयोग काय, असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारला जात आहे.

मोकाट श्वानांचा उपद्रव

रत्नागिरी : शहरातील टी.आर.पी., साळवीस्टाॅप, सन्मित्रनगर व अन्य भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणेही धोकादायक बनले. वाहनांचाही श्वान पाठलाग करतात. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

इंटरनेट सेवेचा बोजवारा

आवाशी : खेड शहरासह ग्रामीण भागात सध्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट सेवा कोलमडली असल्याने, शासकीय कार्यालयासह बँकांमधील कामकाज विस्कळीत झाले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

संमिश्र वातावरणाचा त्रास

रत्नागिरी : सध्या मळभ तर मध्येच कडाक्याचे ऊन असे वातावरण सुरू झाले आहे. या संमिश्र वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या वातावरणामुळे उष्णतेच्या विकारांबरोबरच सर्दी, तापसरी, डोकेदुखी, पित्ताचा त्रास सुरू झाला आहे.

विनापरवाना वाळू उपसा

दापोली : तालुक्यात बेकायदा वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील पांगारी भागातही सध्या बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही.