शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाखांची वृक्षलागवड

By admin | Updated: July 6, 2016 00:34 IST

शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती : सामाजिक संस्थांचाही उल्लेखनीय सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असतानाच रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, किंबहुना अधिकच वृक्षलागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांच्यातर्फे जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्षलागवड पूर्ण करण्यात आली आहे.सुरुवातीला जिल्ह्यास १ लाख ६४ हजार १८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आॅनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ४७९ वृक्षलागवडचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले. आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ८६ हजार ५५० झाडे लावण्यात आली आहेत, तर आॅफलाईन पद्धतीने १८ हजार ४२५ झाडे लावण्यात आली. जिल्हाभरात एकूण २ लाख ४ हजार ९७५ झाडांची लागवड करण्यात आली. त्यासाठी १ लाख ५३ हजार ५२ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.संपूर्ण जिल्हाभरात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ८४८ झाडे लावण्यात आली. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात २६ हजार ३४५, लांजा तालुक्यात २४ हजार ७०१ वृक्षलागवड करण्यात आली. अनेक व्यक्ती झाडे लावण्यासाठी स्वत:हून पुढे आल्या आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी तर कुंड्यांमध्ये झाडे लावली.विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीदेखील वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आॅनलाईन पद्धतीने लागवडीचा डेटा ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने लागवड करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. संगमेश्वर तालुकावगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये आॅफलाईन लागवड करण्यात आली. अन्य तालुक्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवडीचा हा उपक्रम अजूनही सुरुच आहे. (प्रतिनिधी)वृक्षलागवडीचे हे शिवधनुष्य विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे पेलले. त्यामुळेच जिल्ेह्यात १०० टक्के वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.