शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाखांची वृक्षलागवड

By admin | Updated: July 6, 2016 00:34 IST

शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती : सामाजिक संस्थांचाही उल्लेखनीय सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असतानाच रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, किंबहुना अधिकच वृक्षलागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांच्यातर्फे जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्षलागवड पूर्ण करण्यात आली आहे.सुरुवातीला जिल्ह्यास १ लाख ६४ हजार १८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आॅनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ४७९ वृक्षलागवडचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले. आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ८६ हजार ५५० झाडे लावण्यात आली आहेत, तर आॅफलाईन पद्धतीने १८ हजार ४२५ झाडे लावण्यात आली. जिल्हाभरात एकूण २ लाख ४ हजार ९७५ झाडांची लागवड करण्यात आली. त्यासाठी १ लाख ५३ हजार ५२ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.संपूर्ण जिल्हाभरात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ८४८ झाडे लावण्यात आली. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात २६ हजार ३४५, लांजा तालुक्यात २४ हजार ७०१ वृक्षलागवड करण्यात आली. अनेक व्यक्ती झाडे लावण्यासाठी स्वत:हून पुढे आल्या आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी तर कुंड्यांमध्ये झाडे लावली.विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीदेखील वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आॅनलाईन पद्धतीने लागवडीचा डेटा ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने लागवड करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. संगमेश्वर तालुकावगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये आॅफलाईन लागवड करण्यात आली. अन्य तालुक्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवडीचा हा उपक्रम अजूनही सुरुच आहे. (प्रतिनिधी)वृक्षलागवडीचे हे शिवधनुष्य विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे पेलले. त्यामुळेच जिल्ेह्यात १०० टक्के वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.