शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाखांची वृक्षलागवड

By admin | Updated: July 6, 2016 00:34 IST

शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती : सामाजिक संस्थांचाही उल्लेखनीय सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असतानाच रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, किंबहुना अधिकच वृक्षलागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांच्यातर्फे जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्षलागवड पूर्ण करण्यात आली आहे.सुरुवातीला जिल्ह्यास १ लाख ६४ हजार १८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आॅनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ४७९ वृक्षलागवडचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले. आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ८६ हजार ५५० झाडे लावण्यात आली आहेत, तर आॅफलाईन पद्धतीने १८ हजार ४२५ झाडे लावण्यात आली. जिल्हाभरात एकूण २ लाख ४ हजार ९७५ झाडांची लागवड करण्यात आली. त्यासाठी १ लाख ५३ हजार ५२ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.संपूर्ण जिल्हाभरात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ८४८ झाडे लावण्यात आली. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात २६ हजार ३४५, लांजा तालुक्यात २४ हजार ७०१ वृक्षलागवड करण्यात आली. अनेक व्यक्ती झाडे लावण्यासाठी स्वत:हून पुढे आल्या आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी तर कुंड्यांमध्ये झाडे लावली.विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीदेखील वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आॅनलाईन पद्धतीने लागवडीचा डेटा ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने लागवड करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. संगमेश्वर तालुकावगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये आॅफलाईन लागवड करण्यात आली. अन्य तालुक्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवडीचा हा उपक्रम अजूनही सुरुच आहे. (प्रतिनिधी)वृक्षलागवडीचे हे शिवधनुष्य विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे पेलले. त्यामुळेच जिल्ेह्यात १०० टक्के वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.