शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अपघातांत दोन ठार, सहा गंभीर

By admin | Updated: May 17, 2015 01:33 IST

पाच दुर्घटना : मृतांमध्ये एक सांगलीचा, तर दुसरा पीरलोटेचा

रत्नागिरी / आवाशी : रत्नागिरी, लांजा आणि खेड तालुक्यांत झालेल्या पाच वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विश्वास वसंत गुरव (वय २६, टेंबे, तासगाव, सांगली) आणि अमर अनंत जोईल (२५, पीरलोटे, ता. खेड) या दोघांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विश्वास वसंत गुरव (२६, टेंबे, तासगाव) हा स्कॉर्पिओ (एमएच०९ बीएक्स ९५०९) घेऊन सांगलीहून गणपतीपुळ्याच्या दिशेने निघाला होता. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गाडी गणपतीपुळे मार्गावरील जाकादेवी येथे आली असताना दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना गुरव याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडली. यात गुरव याचा जागीच मृत्यू झाला. याच गाडीतील सुचिकेत वसंत मोरे (१५) व संदीप माणिक बुचके (२०, दोघेही रा. खानापूर, सांगली) हे गंभीर जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पीरलोटे येथे शुक्रवारी मध्यरात्री १२.३0 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने पिकअप जीपला धडक दिल्याने पिकअप चालक अमर जोईल जागीच ठार झाला. अमर कामानिमित्त पिकअप जीप घेऊन चिपळूण येथे गेला होता. त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात अमरचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका अपघातात रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने जाणाऱ्या डंपरसमोर (एमएच ०८ डब्ल्यू ९७९९) गाय आल्याने डंपरचालकाने अचानक गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी मागून रमेश नेमाराम चौधरी (वय २५, खेर्डी, चिपळूण) हे आपली पत्नी देविका चौधरी (२४) हिच्यासह दुचाकीवरून चिपळूणहून लांजाच्या दिशेने चालले होते. डंपरचा वेग कमी झाल्याने चौधरींनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी भरधाव वेगाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या इनोव्हा कारची (एमएच ४८ एस ७६५१) दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात चौधरी पती-पत्नी दोघेही जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खानू-मठ येथे घडला. लांजा तालुक्यातील आसगे येथे शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला अपघात होऊन दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींची नांवे राजू रमण सरकार (वय ४५, भटवाडी, लांजा) व नीलेश नामदेव लांजेकर (३२, वैभव वसाहत, लांजा) अशी नावे आहेत. गोवा ते दिल्ली असा कोलगेटची वाहतूक करणारा ट्रक (एचआर ५५ के ७११०) रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कापडगाव (ता. रत्नागिरी) येथे झाला. (शहर वार्ताहर)