शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

राजापुरातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या राजापूर शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य रस्त्यांच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून दोन कोटी रुपये ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या राजापूर शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य रस्त्यांच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी दिली आहे. राजापूर नगर परिषदेला हा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिला. हा निधी मिळण्यासाठी आमदार राजन साळवी व माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी पाठपुरावा केल्याचे नगराध्यक्ष खलिफे यांनी सांगितले.

राजापूर शहर आणि तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अनेक रस्ते, पायवाटा, पूल वाहून गेले होते. राजापूर शहरातील मुख्य रस्ता तसेच शिवाजी पथ चिंचबांध वरची पेठ रस्ता व शहरातील अन्य भागांतील रस्त्याची अतिवृष्टीत हानी झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे जिकिरीचे बनले होते.

याकरिता नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करून निधीची मागणी केली होती. तर या निधीसाठी आमदार राजन साळवी व माजी आमदार ॲड. खलिफे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे नगरविकास खात्याकडून राजापूर शहरातील या रस्त्यांच्या डागडुजीसाठी आता दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच रस्त्यांचे डागडुजीचे काम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये जवाहर चौक ते शिवाजी पथ रस्ता काँक्रीटीकरण केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी दिली.